AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिरंग्याची सलामी अखेरची ठरली, तलावाजवळ कपडे, चपला.. ते तिघं जिवलग मित्र…  काळीज हेलावून टाकणारी घटना

प्रजासत्ताक दिनाच्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तिघांवर काळाने अशाप्रकारे घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

तिरंग्याची सलामी अखेरची ठरली, तलावाजवळ कपडे, चपला.. ते तिघं जिवलग मित्र...  काळीज हेलावून टाकणारी घटना
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 27, 2023 | 12:00 PM
Share

निलेश दहात, चंद्रपूरः कालच्या प्रजासत्ताक दिनाला (Republic day) राज्यभरातील शाळांमधून ध्वजारोहणासहित कार्यक्रम घेण्यात आले. देशाच्या राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी विद्यार्थी मोठ्या तयारीने या दिवशी शाळेत जातात. चंद्रपुरातही (Chadrapur) असंच वातावरण होतं. एका शाळेतले 3 मित्र ध्वजारोहणाला (Flag hosting) मोठ्या उत्साहात उपस्थित राहिले. पण कालची तिरंग्याला त्यांनी दिलेली सलामी अखेरची ठरली. ध्वजारोहणानंतर शाळेला मिळालेल्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी तिघे तलावावर गेले. पोहण्याची मजा घ्यायची म्हणून तलावात उतरले अन् पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तिघेही बुड्याल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

चंद्रपुरात अल्ट्राटेक कंपनीच्या परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. काल दुपारपासून मुले घरी न परतल्यामुळे पालकांनी शोधाशोध सुरु केली. अखेर रात्री कंपनीच्या परिसरातील तलावाजवळ मुलांचे कपडे, चपल्यांचे जोड सापडले. नातेवाईकांच्या पोटात गोळाच आल्याची स्थिती होती. कशी बशी रात्र काढली. सकाळपासून बचावकार्य सुरु झालं… अन् जे घडायला नको होतं तेच घडल्याचं समोर आलं.

अग्निशमक दलाच्या जवानांना या तिन्ही मुलांचे मृतदेह आढळले. तलावातील गाळात फसल्याने या तिन्ही मुलांना प्राण वाचवता आले नाहीत, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

कुठे घडली घटना?

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात आवारपूर येथे अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आहे. या परिसरात राहणाऱ्या तीन मुलांबाबत ही दुर्दैवी घटना घडली.

ही तिन्ही मुलं दहा वर्षाची होती. एकाच वर्गात शिकत होती. काल सुट्टी असल्याने सिमेंट कंपनीच्या कॉलनीत राहणारी ही मुलं खेळायला बाहेर पडली. मात्र रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली. रात्री कंपनीच्या परिसरात असलेल्या तलावाजवळ मिळाले मुलांचे कपडे आणि जोडे-चपला आढळल्या.

या घटनेत मृत झालेल्या मुलांची नाव पारस गोवारदीपे, अर्जुन सिंह आणि दर्शन बसेशंकर अशी आहेत. तलावात असलेल्या गाळामध्ये पाय फसल्याने मुलं बुडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. प्रजासत्ताक दिनाच्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तिघांवर काळाने अशाप्रकारे घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.