AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ मागणीसाठी नागरिक चक्क मुंबई पर्यन्त पायी मोर्चा काढणार, कारण तर बघा..

पोलीस आयुक्त यांच्यासह आमदारांकडे अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करून द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहे.

'त्या' मागणीसाठी नागरिक चक्क मुंबई पर्यन्त पायी मोर्चा काढणार, कारण तर बघा..
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 02, 2022 | 6:46 PM
Share

नाशिक : नाशिक शहरातील (Nashik City) अंबड परिसरातील नागरिक गुन्हेगारीने अक्षरशः हैराण झाले आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून अंबड औद्योगीत वसाहतीमध्ये स्वतंत्र पोलीस ठाणे (Police Station) निर्माण करून द्या अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे. मात्र, वर्षानुवर्षे मागणी मान्य होत नसतांना गुन्हेगारांचा हैदोस काही केल्या कमी होत नाहीये. अशातच आता स्थानिक लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी थेट मुंबईला (Mumbai) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी पायी मोर्चा काढला जाणार आहे. अंबड परिसरात कधी धारधार शस्र घेऊन मध्यरात्री धिंगाणा घातला जातो, तर नागरिकांच्या घरावर दगडफेक करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर कधी थेट वाहने जाळपोळ केल्याच्या घटना घडत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.

नाशिकच्या अंबड परिसरातील माजी नगरसेवक राकेश दोंदे आणि परिसरातील नागरिकांनी काही दिवसांपासून स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

पोलीस आयुक्त यांच्यासह आमदारांकडे अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करून द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहे.

त्यातच मागणीला यश येत नसल्याने नागरिक आधीच संतप्त असतांना नागरिकांच्या घरावर दगडफेक, वाहनांची जाळपोळ, अपहरण, खून आणि घरफोडी सारख्या घटना घडत आहे.

अंबड परिसर हा मोठा असल्याने पोलिसांचे मनुष्यबळ देखील कमी पडत असून गुन्हेगारी रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.

अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप येथी लोकप्रतिनिधी आणि नागरिक करीत असून थेट मुख्यमंत्र्यांकडे कथन करणार आहे.

नाशिक येथून शनिवारी हा मोर्चा सकाळी 9 वाजता निघणार आहे. कारगिल चौक येथून सुरुवात होणार आहे.

पुढे लागणाऱ्या पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाणार असून नागरिक मुंबईकडे रवाना होणार आहे.

साहेबराव दातीर, रामदास दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे संदीप नाठे, हेमंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई पदमोर्चा काढण्यात येणार आहे.

Follow Us
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.