AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जीवाचं काही बरं वाईट करू नकोस यार, बिट्टीची काळजी घे..’, आधी लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, 24 तासांनी उचललं टोकाचं पाऊल

उत्तर प्रदेशातील हरदोई येथे २३ वर्षीय प्रियांकाने लग्नाच्या वाढदिवसानंतर आत्महत्या केली. तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने पतीला दीड महिन्याच्या मुलीची काळजी घेण्याची विनंती केली. पालकांनी हुंडाबळीचा आरोप केला आहे, तर मानसिक आजारामुळे पत्नीने हे पाऊल उचलल्याचं पतीने म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, ज्यात सुसाईड नोट आणि शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.

‘जीवाचं काही बरं वाईट करू नकोस यार, बिट्टीची काळजी घे..’, आधी लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, 24 तासांनी उचललं टोकाचं पाऊल
विवाहीत महिलेनं उचललं टोकाचं पाऊल
| Updated on: Mar 11, 2026 | 8:26 AM
Share

उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये एक हादरवणारी घटना घडली आहे. तिथे एका 23 वर्षांच्या विवाहीत महिलेने लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. मात्र मृत्यूपूर्वी तिने एक इमोशल सुसाईड नोट लिहील होती. ज्यामध्ये तिने तिचया पतीला, त्यांच्या छोट्याशी ( दीड महिने) लेकीची काळजी घेण्याची विनंती केली. या घटनेने सगळेच हादले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका असं मृत महिलेचं नाव असून, अवघ्या वर्षभरापूर्वीच तिचं अजमतपुर मध्ये राहणाऱ्या विशालशी लग्न झालं होतं. त्यांना अव्घाय दीज महिन्याची छोटी मुगी देखील आहे. शनिवारी, या जोडप्याने त्यांचा पहिला लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. मात्र रविवारी दुपारी, घरातील सगळे पुरुष कामावर गेले होते, तर घरातील महिला या शेळ्या चारायला घेऊन गेल्या असतानाच, प्रियांकाने तिच्या खोलीत साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा तिची वहिनी घरी परतली आणि तिला प्रियांकाची दीड महिन्याची मुलगी रडताना दिसली, तेव्हा तिने आत पाहिल्यावरती हादरली, समोर प्रियांकाचा मृतदेह लटकलेला आढळला.

आनंदात राहा.. ओके बाय

या घटनेने सगळ्यांना धक्का बसला, सर्वांवर दु:खाचा डोंगरच कोसळला, शेजारी-पाजारीही जमले. कोणीतरी पोलिसांना या दुर्दैवी घटनेची माहिती दिल्यावर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. तेथून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली, ती वाचल्यावर सर्वांचे डोळे पाणावले. मृत्यूपूर्वी प्रियांकाने ही चिठ्ठी लिहीली होती. “माझ्या प्रिय मुलीची काळजी घे. मला काहीही समजलं, नाही, पण तू काही ( जीवाचं बरवाईट) करू नकोस, नाहीतर आपल्या मुलीची काळजी कोण घेईल? आनंदाने जग, यार. ओके बाय.” असं तिने लिहीलं होते. या चिठ्ठीच्या शेवटी “बाबूजी” असेही लिहीलं होतं, ते कोणासाठी, नेमकं कारण काय याचा पोलिस तपास करत आहेत.

हत्या की आत्महत्या ?

प्रियांकाच्या मृत्यूनंतर, तिचे आई-वडील आणि सासरच्या लोकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध सुरू झाले आहे. मृत महिलेची आई गीता हिने असा आरोप लावला की, हुंड्याच बाईक आणि सोन्याच्या चेनची मागणी करत जावई विशालने आमच्या मुलीला त्रास दिला होता. आणि त्यानेच तिची हत्या केली. मात्र , पत्नी प्रियांका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती आणि या तणावाखाली त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असा दावा तिचा पती विशालने केला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे आणि हस्तलेखन तिचंच आहे का हे पडताळून पाहण्यासाठी त्याची तपासणी केली जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच हे आत्महत्येचे प्रकरण आहे की सखोल कट आहे हे स्पष्ट होईल असं अत्रौली पोलिस स्टेशनचे प्रभारी सतीश चंद्र यांनी सांगितलं.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.