AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये पहाटेच्या वेळी पुन्हा अग्नितांडव, कामगारांनी पळ काढल्याने वाचले पण…

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली असून वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.

नाशिकमध्ये पहाटेच्या वेळी पुन्हा अग्नितांडव, कामगारांनी पळ काढल्याने वाचले पण...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 03, 2022 | 1:04 PM
Share

नाशिक : नाशिकमध्ये आगीच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाही. नाशिक-पुणे महामार्गावर बसला आग लागल्याची घटना होऊन काही तास उलटत नाही तोच एका फर्निचर मॉलसह भंगार गोदामाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. याच दरम्यान या फर्निचर मॉलमध्ये आठ ते दहा कामगार झोपलेले होते. त्यांना वेळीच जाग आल्याने मोठी जीवितहानी टळली असून आगीत मात्र लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. नाशिकच्या वडनेर-पाथर्डी रोड वर ही घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत संपूर्ण मॉलसह भंगार गोदाम जळून खाक झाले आहे. मध्यरात्रीच्या वेळी लागलेल्या या आगीच्या घटनेत अग्निशमन दलाने मोठी कसरत करत ही आग आटोक्यात आणली होती. धुराचा वास येऊ लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्याने नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती कळवत पाचारण केले होते.

नाशिक शहर परिसर आणि महामार्गावर गेल्या काही दिवसांत आगीच्या घटना वारंवार घडत आहे.

मागील महिन्यात खाजगी बसला अपघात झाल्यानंतर बसला लागलेली आग आणि त्यात अनेकांचा होरपळून मृत्यू झाला होता.

बुधवारी नाशिक पुणे महामार्गावर चालत्या बसला आग लागल्याने बस संपूर्ण जळून खाक झाली होती त्यात सुदैवाने प्रवाशांच्या ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

या दोन्ही घटना ताज्या असतांना नाशिक शहर हद्दीतील वडनेर पाथर्डी रोड येथे फर्निचर मॉल आणि भंगार गोदामाला आग लागली होती.

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली असून वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.

मध्यरात्रीच्या वेळी आग लागल्याने ही बाब कामगारांच्या देखील लक्षात आली नव्हती, मात्र झोपेत असलेल्या कामगारांना आगीची झळ बसताच त्यांनी पळ काढला.

दरम्यान, ही आगीची घटना धडत असतांना धुरामुळे वास येऊ लागला होता, काही घरे जवळ असल्याने त्यांनाही याची झळ बसली आहे.

नाशिकरोड येथील अग्निशमन दलाला ही माहिती देताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचत आगीवर नियंत्रण मिळवले होते

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.