AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळा भरली तरी मुलं शाळेत पोहचली नाही, शिक्षकाने घरी फोन करुन विचारणा केली, यानंतर एकच खळबळ उडाली, कारण काय?

नेहमीप्रमाणे शाळकरी मुलं घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली. मात्र शाळा भरली तरी मुलं शाळेत न आल्याने शिक्षकाने पालकांना फोन करुन कारण विचारले. या फोननंतर धक्कदायक घटना उघडकीस आली आहे.

शाळा भरली तरी मुलं शाळेत पोहचली नाही, शिक्षकाने घरी फोन करुन विचारणा केली, यानंतर एकच खळबळ उडाली, कारण काय?
अंबरनाथमध्ये चार शाळकरी मुले बेपत्ताImage Credit source: Google
| Updated on: Apr 25, 2023 | 6:46 PM
Share

अंबरनाथ : सध्या सर्वत्रच शाळांना सुट्टीचे वेध लागले आहेत. मुलांच्या परीक्षा जवळपास संपत आल्या आहेत. त्यामुळे अनेक मुले आता गावी जाऊन सुट्टीचा आनंद लुटण्याचा बेत आखत आहेत. याचदरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात एका शाळेमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. यामागे कारण आहे ते चार शाळकरी मुले गायब होण्याचे. घरातून शाळेत जाण्यासाठी निघालेली चार मुले शाळेत पोहोचलीच नाही. काही वेळ वाट बघितल्यानंतर मुले शाळेत का आली नाहीत, यासाठी शिक्षकाने पालकांना फोन कॉल करुन विचारणा केली. त्यावेळी मुलांनी शाळा गाठण्यासाठी कधीच घर सोडले होते, असे कळताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली. यानंतर मुलांचा शोध घेण्यासाठी चारही दिशेने शोधाशोध सुरू झाली.

मुलांचे अपहरण करण्यात आल्याचा संशय

बेपत्ता झालेली मुले 14 ते 15 वर्षे वयोगटातील असून ही सर्व मुले अंबरनाथच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये राहतात. चारही मुले शाळेच्या दिशेने पायी येत असताना गायब झाल्यामुळे परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात यापूर्वी मुलांचे अपहरण करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या सर्व पार्श्वभूमीवर बेपत्ता झालेल्या मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित चार मुलांना अज्ञात लोकांनी पळवून नेले असल्याचाही संशय वर्तविला जात आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून अज्ञात लोकांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा देखील नोंदवला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 363 अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुलांनी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोडले होते घर

शाळकरी मुलांनी शाळेत जाण्यासाठी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपले घर सोडले होते. मात्र नंतर ही मुले शाळेत पोहोचली नाहीत. तसेच बराच वेळ उलटून गेल्यानंतर घरीही परतली नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनी अंबरनाथ तसेच आसपासच्या परिसरात मुलांचा शोध घेतला, मात्र त्यादरम्यान मुलांबाबत कुठेच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे अखेर स्थानिक शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये घटनेबाबत फिर्याद नोंद करण्यात आली.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.