AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Extra Marital Affairs : घर बांधायला काढलं, मजुरासोबतच झाले प्रेमसंबंध त्यानंतर… धक्कादायक घटना समोर!

कुटुंबातील सर्वजण खूप आनंदी होते. दोघांनी घर बांधण्याचं काम सुरू केलं होतं. मात्र कोणीच कल्पनाही केली नव्हती घर पूर्ण होण्याच्या आतच दोघाचं घर बसलं.

Extra Marital Affairs : घर बांधायला काढलं, मजुरासोबतच झाले प्रेमसंबंध त्यानंतर... धक्कादायक घटना समोर!
| Updated on: May 10, 2023 | 9:13 PM
Share

Crime : कलियुगामध्ये कोण काय करेल याचा काही नेम नाही. प्रेम प्रकरणांमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विवाहित महिला आणि पुरूषांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं अनेकवेळा समोर आलं आहे. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये 12 वर्षांचा सुखाचा संसार मोडत विवाहित महिलेने जे नको ते पाऊल उचललं आणि संपूर्ण घर बसलं.

नेमकं काय आहे प्रकरण? सतीश आणि ज्योती यांचे 12 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, दोघांना दोन मुले आहेत. कुटुंबातील सर्वजण खूप आनंदी होते. दोघांनी घर बांधण्याचं काम सुरू केलं होतं. मात्र कोणीच कल्पनाही केली नव्हती घर पूर्ण होण्याच्या आतच दोघाचं घर बसलं.

घर बांधायला काढल्यावर रोहतास नावाचा एक मजूर तिथे काम करत होता. रोहतासचे मजूरीचे काम करता करता सतीशची पत्नी ज्योतीसोबत प्रेम प्रकरण सुरू झालं. दोघांचं प्रेम प्रकरण रंगात आलं होतं पण दोघांच्या अवैध संबंधांबाबत समजताच त्याने विरोध करण्यास सुरुवात केली. पण दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम झालं होतं की त्यांनी नको तो करण्याचा निर्णय घेतला.

रोहतास यांनी सतीशला मार्गातून हटवण्याची योजना तयार केली. 5 मे रोजी रात्री रोहतासने सतीशला दारू पाजली. त्यानंतर त्याला त्याच्याच ई-रिक्षात बसवून गुजराणी रोडवर नेले. जिथे त्याने सतीशचा पायजमाच्या नाडीने गळा आवळून खून केला.

दरम्यान, या प्रकरणी एएसपी लोगेश कुमार यांनी सांगितले की, सीआयए-1 आणि सायबर पोलिस स्टेशनने तपास करताना दोन्ही आरोपींना 72 तासांत अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची कोठडी मिळाली. पोलिसांनी सांगितले की, मृत सतीश हा दोन मुलांचा बाप असून प्रियकर रोहतास अविवाहित आहे. हरियाणातील भिवानी येथील ही घटना आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.