Hariyana Crime: हिस्सारमध्ये एकाच दुचाकीवर स्वार असलेल्या तिघांचा होरपळून मृत्यू, अपघात की हत्या? याचा शोध सुरु

| Updated on: Dec 28, 2021 | 6:50 PM

सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तिघेही एकाच दुचाकीवरून सेक्टर 27 येथील गुजराती ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण आटोपून तिघेही घरी परतत होते. तिघेही सातरोड जवळ पोहोचले असता एका अनोळखी वाहनाने त्यांना धडक दिली आणि दुचाकीने पेट घेतला.

Hariyana Crime: हिस्सारमध्ये एकाच दुचाकीवर स्वार असलेल्या तिघांचा होरपळून मृत्यू, अपघात की हत्या? याचा शोध सुरु
हिस्सारमध्ये एकाच दुचाकीवर स्वार असलेल्या तिघांचा होरपळून मृत्यू
Follow us on

हरियाणा : एकाच दुचाकीवर आलेल्या तीन तरुणांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना हरियाणातील हिस्सारमध्ये घडली आहे. अपघातानंतर दुचाकी जळून खाक झाली असून, त्यावरील तीन तरुणांचे मृतदेहही जळाले आहेत. याप्रकरणी सध्या पोलिसांनी रस्ते अपघाताची नोंद केली आहे. मात्र हा अपघात नसून खुनाचा गुन्हा असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

काय घडले नेमके?

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली बायपासवर हॉटेल रेडवूड आहे. आर्य नगरमधील रहिवासी निशांत हे हॉटेल चालवत होता. या हॉटेलमध्ये भटुकलन येथील रहिवासी अजय आणि सूर्यनगर येथील रहिवासी अभिषेक काम करत होते. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तिघेही एकाच दुचाकीवरून सेक्टर 27 येथील गुजराती ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण आटोपून तिघेही घरी परतत होते. तिघेही सातरोड जवळ पोहोचले असता एका अनोळखी वाहनाने त्यांना धडक दिली आणि दुचाकीने पेट घेतला. या घटनेत तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला. तिघांचाही मृत्यू भाजल्याने की जखमांमुळे झाला हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल.

घटनेनंतर रस्त्याने जाणाऱ्यांनी तिघांनाही सामान्य रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच डीआयजी आणि हिस्सारचे पोलीस अधीक्षक बलवान सिंग राणाही घटनास्थळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. प्राथमिक तपासात हे प्रकरण अपघाती असल्याचे दिसते, असे त्यांनी सांगितले.

हा अपघात असून हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप

मात्र, हा अपघात नसून हत्या असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे पोलीस हत्येच्या दृष्टीकोनातूनही तपास करत आहे. तपासासाठी सहा विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. घटनेच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. निशांतला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार आर्यनगर येथील रहिवासी असलेल्या निशांतच्या नातेवाईकांनी केली आहे.

मृत अभिषेकला दोन महिन्यांचा मुलगा

मृतांपैकी एक अभिषेकचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून त्याला 2 महिन्यांचा मुलगा आहे. ही घटना रस्ता अपघात असू शकत नाही, हे संपूर्ण प्रकरण खुनाचे आहे कारण दुचाकी आणि बाईकचा रस्ता अपघातात समावेश होता. दुचाकीस्वार जळून मृत्यूमुखी पडल्याचे कधीच ऐकले नाही. (In Hissar, three persons riding on the same two-wheeler died on the spot)

इतर बातम्या

संसार उमलण्याआधीच गालबोट, सासरी जाताना गळ्यात मांजा अडकला, नवविवाहित तरुणाचा मृत्यू

Ludhiana Court Blast : मुंबईसुद्धा टार्गेटवर? लुधियाना ब्लास्टचा मास्टरमाईंड जर्मनीतून अटक, अनेक नवे खुलासे