AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक गावात दुर्गंधी सुटली, वास कुठून येतो याचा शोध घेतला, मग जे दिसलं पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली !

दीर वहिनीला भेटायला तिच्या घरी गेला. तेथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि दिराने वहिनीसह दोन पुतण्यांना संपवले. मग मृतदेह खड्ड्यात पुरले. पण एका गोष्टीमुळे सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.

अचानक गावात दुर्गंधी सुटली, वास कुठून येतो याचा शोध घेतला, मग जे दिसलं पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली !
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटाImage Credit source: Google
| Updated on: Apr 03, 2023 | 1:25 PM
Share

गुमला : झारखंडमधील गुमला येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरगुती वादातून दिरानेच आपल्या विधवा वहिनी आणि दोन पुतण्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर तिन्ही मृतदेह शेणाच्या खड्ड्यात पुरले आणि आपल्या घरी निघून गेला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली. जिल्ह्यातील बसिया पोलीस स्टेशन हद्दीतील लुंगटू पदरा टोली गावात ही घटना घडली होती. अनोस कुंदलना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पतीच्या निधनानंतर दोन मुलांसह वेगळी राहत होती महिला

मयत महिलेच्या पतीचे 2017 मध्ये निधन झाले होते. तेव्हापासून ती आपल्या दोन मुलांसह वेगळी राहत होती. तर तिचे दोन्ही दीरही तिच्या घराच्या आसपास वेगवेगळे राहत होते. अनोस हा 24 मार्च रोजी वहिनी अर्पिताच्या घरी आला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की अनोसने वहिनीची हत्या केली. यावेळी आईला वाचवण्यासाठी आलेल्या दोन्ही मुलांनाही अनोस संपवले.

हत्या केल्यानंतर तिन्ही मृतदेह घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या शेणाच्या खड्ड्यात टाकून पुरले. यानंतर अनोस वहिनीच्या घराचा दरवाजा लावून आपल्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी अर्पिताचा दुसरा दीर विश्रामने तिचे दार बंद पाहिले. त्याला वाटले ती कुठेतरी गेली असेल, मात्र तीन दिवस उलटले तरी ती घरी परतली नाही. यामुळे घरच्यांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

खड्ड्यातून वास सुटल्यानंतर घटना उघडकीस

पोलीसही 10 दिवस अर्पिता आणि तिच्या मुलांचा शोध घेत होते. मात्र त्यांचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. यादरम्यान मृतदेह सडायला लागल्याने त्या खड्ड्यातून प्रचंड दुर्गंधी पसरली होती. यामुळे पोलिसांनी सदर खड्डा खोदून पाहिले असता आत तिघांचे मृतदेह आढळले. यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

घटना उघड होताच अनोस गाव सोडून पळून गेला. मात्र गावकऱ्यांनी दुसऱ्या गावातून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संपत्ती आणि एलआयसीच्या पैशासाठी दीराने वहिनीला संपवल्याची माहिती कळते. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...