दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली वहिनी, मग पतीचा काटा काढत मृतदेह लपवला; पण…

| Updated on: Oct 31, 2022 | 4:42 PM

रामसुशील पाल असे 40 वर्षीय मयत पतीचे नाव आहे. रीवा जिल्ह्यातील उमरी गावात रामसुशील आपल्या कुटुंबासह राहत होता. रामसुशीलच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने त्याने रंजना हिच्याशी दुसरा विवाह केला होता.

दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली वहिनी, मग पतीचा काटा काढत मृतदेह लपवला; पण...
दीड वर्षानंतर हत्येचे रहस्य उलगडले
Image Credit source: social
Follow us on

रीवा : दिराच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेने दीर आणि चुलत सासऱ्याच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने महिलेने पतीचा काटा काढला आणि तब्बल दीड वर्षे मृतदेह लपवून ठेवला. त्यानंतर मृतदेह जंगलात फेकून दिला. जंगलात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि अखेर महिलेची पोलखोल झाली. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह चौघांना अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

रामसुशील पाल असे 40 वर्षीय मयत पतीचे नाव आहे. रीवा जिल्ह्यातील उमरी गावात रामसुशील आपल्या कुटुंबासह राहत होता. रामसुशीलच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने त्याने रंजना हिच्याशी दुसरा विवाह केला होता.

पत्नीचे दिराशी प्रेमसंबंध जुळले

विवाहाच्या दोन वर्षांनंतर रंजनाचे दिर गुलाबसोबत प्रेमसंबंध जुळले. रामसुशीलला याबाबत कळल्यानंतर दररोज पती-पत्नीमध्ये भांडण होत असे. यामुळे रंजना आणि गुलाबने रामसुशीलचा काटा काढण्याचे ठरवले. रामसुशीलच्या मृत्यूनंतर त्याची संपत्तीही आपल्याला मिळेल असे दोघांना वाटले.

हे सुद्धा वाचा

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे दोघांमध्ये रोज भांडण व्हायचे

रंजना आणि गुलाबने या कटात रामसुशीलचा चुलत भाऊ अंजनी, काका रामपती यांच्यासह अन्य दोघांना सामील करुन घेतले. प्लाननुसार आधी रामसुशीलला समोशामध्ये उंदिर मारण्याचे औषध मिसळून खाऊ घातले. यामुळे रामसुशीलचा मृत्यू झाला. त्यानंतर गुलाब आणि अंजनीने मृतदेहाचे दोन तुकडे करुन गोणीत भरले आणि दीड वर्ष भुशामध्ये लपवले.

भुसा संपत आल्याने मृतदेह जंगलात फेकला

भुसा संपत आल्याने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न आरोपींसमोर उभा रहिला. यामुळे मृतदेह संपूर्ण सडल्याने आरोपींनी भाटी येथील जंगलात फेकून दिला. यानंतर रंजना उमरी गाव सोडून मिर्झापूरला निघून गेली.

रीवा पोलिसांना जंगलात पुरुषाचा सांगाडा मिळाल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सांगाडा ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर गांधी मेमोरियल रुग्णालयात सांगाड्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली.

चौकशी दरम्यान पोलिसांना रामसुशीलबाबत माहिती मिळाली

हत्येचा तपास करत हा सांगाडा कुणाचा आहे हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी आसपासच्या परिसरात चौकशी सुरु केली. चौकशी दरम्यान पोलिसांना दीड वर्षापूर्वी गायब झालेल्या रामसुशीलबाबत माहिती मिळाली.

रामसुशील दीड वर्षापासून दिसला नाही आणि त्याची पत्नीही गाव सोडून गेल्याचे गावातील लोकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ मिर्झापूरला दाखल होत रंजनाला ताब्यात घेतले. रंजनाला पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबुल केला.

पोलिसांनी पत्नीसह चौघांना अटक केली

यानंतर पोलिसांनी रंजनासह गुलाब, अंजनी, रामपती यांना अटक केली. तर अन्य दोन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचाही कसून शोध घेत आहेत. सर्व आरोपींवर कलम 302, 201 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.