मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर

khavdya dongar case: छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरील त्या मृत्यूने अवघा महाराष्ट्रच नाही तर देश हादरला. या मृत्यू प्रकरणात अनेक कांगोरे समोर येत आहे. दोन दावे प्रामुख्याने समोर येत आहे. आयफोन आणि कौटुंबिक वाद यातून ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.

मी तुमच्या पाया पडेन...असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
कुणाल, संगिता आणि मुरलीधर चांदगुडे
| Updated on: Aug 23, 2026 | 11:42 PM

खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबातील मृत्यू प्रकरणात गेल्या दोन दिवसात अनेक वेगवेगळ अँगल समोर आले आहेत. सुरुवातीला आयफोनचे कारण समोर आले. मग महागड्या फोनच्या थकीत हप्त्यावरून वाद टोकाला गेल्याचे म्हटले गेले. तर या वादाचे मूळ कारण कुटुंबातील वाद असल्याचे समोर आले आहे. आई, वडील आणि मुलाच्या एकाचवेळी मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला. कुणाल चांदगुडे, आई संगिता आणि वडील मुरलीधर या सर्वांचाच खवड्या डोंगरावरून खाली पडून मृत्यू झाला. या घटनेने समाजमन हेलावले. सगळीकडे या गोष्टीची चर्चा आहे. संगिता यांच्या जुन्या व्हिडिओतून आता या प्रकरणातील काही कांगोरे समोर येत आहे.

मी तुमच्या पाया पडेन… असं होत नसतं

संगिता आणि मुरलीधर यांच्या लग्नाविषयी घरच्यांना उशीरा माहिती दिल्याचे अथवा हे लग्न त्यांना मान्य नसल्याचे सुरुवातीच्या प्रतिक्रियातून दिसून येते. यामुळे कुटुंबात सूनेवरून विसंवाद होता, हे आता समोर येत आहे. तर संगिता यांच्या युट्युबवरील जुने व्हिडिओ समोर आले. त्यात त्यांनी नणंदेला सुनावल्याचे दिसून येते. भावाला बोलावून घेतले म्हणजे मुलांचं शिक्षण बंद होईल. आमचे हाल होतील. मी तुम्हाला फोन करेल. तुमची विनवणी करेल. पाया पडेन. असं वाटत असेल तर असं होत नसतं, असे संगिता ठणकावताना दिसतात.

माय-लेकाचे व्हिडिओ

संगिता यांच्या व्हिडिओत अनेकदा मुलासोबत भावनिक क्षण शेअर केले आहेत. त्यातील काही व्हिडिओत ते चहा घेताना दिसतात. एका व्हिडिओत कुणाल आईच्या पाय धुताना दिसत आहेत. तर आईची ओटी भरत आहे. नवीन पिढी, तिचे विचार याचे कौतुक करताना संगिता दिसतात. आता पोलीस या व्हिडिओ आधारे या कुटुंबातील गुंतागुंत सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. कुणालने इतक्या टोकाचे पाऊल का टाकले हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्याचे ठोस कारण अद्यापही समोर आलेले नाही. प्रत्येकजण त्याच्या नजरेतून या घटनेकडे पाहत आहे. ज्यांच्यात वादाची किनार होती. ते तिघेही हयात नाही. खवड्या डोंगर मात्र या घटनेने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या डोंगरावर जाण्यास मज्जाव करण्यात यावा. तिथे पोहचण्यास जाणारी वाटच बंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे. प्रशासन या मागणीकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि ते कितपत सोयीस्कर आहे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us