Jalgaon | भरलेल्या रिक्षातून तोल जाऊन रस्त्यात पडली, अकरावीच्या विद्यार्थिनीचा करुण अंत
अनेक खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त किंवा फ्रंट सीट बसवून वाहने चालवतात. याच पद्धतीने प्रवास करणे शेलवड येथील तृप्तीच्या चौधरीच्या जीवावर बेतले.
जळगाव : कॉलेज सुटल्यावर घरी जाताना रिक्षातून (Rickshaw Accident) पडल्याने विद्यार्थिनीला प्राण गमवावे (Student Death) लागले. तृप्ती भगवान चौधरी असं दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. इयत्ता अकरावीत शिक्षण घेणारी 17 वर्षीय तृप्ती तोल गेल्याने रिक्षातून खाली पडली होती. जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) बोदवड तालुक्यात ही घटना घडली. तृप्ती चौधरीला अपघातात गंभीर इजा झाली होती. अपघातानंतर जखमी अवस्थेत जळगावला नेत असताना तिचा रस्त्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तृप्तीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
एसटी संपामुळे विद्यार्थ्यांची दुर्दशा
एसटीचा संप सुरू नसताना बोदवड तालुक्यातील वेगवेगळ्या खेडेगावातील तब्बल 4 हजार 215 विद्यार्थी पासेस काढून शिक्षणासाठी अप-डाऊन करायचे. त्यात इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी असलेल्या अहिल्याबाई होळकर योजनेतून 1 हजार 365, दहावी आणि बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 850 विद्यार्थिनी मानव विकास या बसमधून प्रवास करायच्या. याशिवाय 2 हजार विद्यार्थी मिळून एकूण 4 हजार 295 विद्यार्थी एसटी बसने नियमित प्रवास करत होते.
तर तृप्ती चौधरी वाचली असती…
विद्यार्थ्यांसाठी एसटी दिवसभरातून 21 फेऱ्या करायची. मात्र, कोरोनानंतर शाळा-महाविद्यालये सुरू होताच 8 नोव्हेंबरला एसटीचा संप सुरू झाला. परिणामी सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेक खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त किंवा फ्रंट सीट बसवून वाहने चालवतात. याच पद्धतीने प्रवास करणे शेलवड येथील तृप्तीच्या चौधरीच्या जीवावर बेतले. कदाचित एसटीचा संप सुरू नसता तर ही दुर्घटना घडली नसती.
संबंधित बातम्या :
Virar Accident | भरधाव रिक्षा उलटली, पहाटे चार वाजता अपघाताचा थरार, 15 वर्षांचा मुलगा ठार
CCTV | तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला, Nashik मध्ये तीन वर्षांचा चिमुरडा आश्चर्यकारकरित्या बचावला