AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन मुलांना विष दिलं, पत्नीचाही दाबला गळा आणि त्यानेही … क्षणार्धात 4 जीव शांत !

Man Killled Family In Udaipur : उदयपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तेथे राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रथम आपल्या पत्नी आणि दोन निष्पाप मुलांची हत्या केली. नंतर त्याने स्वतःही पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने असं टोकाचं पाऊल का उचललं?

दोन मुलांना विष दिलं, पत्नीचाही दाबला गळा आणि त्यानेही ... क्षणार्धात 4 जीव शांत !
| Updated on: Jul 26, 2025 | 9:28 AM
Share

राजस्थानमधील उदयपूरमध्ये एका पीनते पत्नीची हत्या केल्यानंतर आत्महत्या करून सर्वस्व संपवले. या भयानक घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. पतीने प्रथम पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली. नंतर त्याने स्वतःही पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली असून ती वाचल्यावकर पोलिसदेखील सुन्न झाले. ही घटना हिरणमग्री पोलीस स्टेशन परिसरातील प्रभात नगर येथील आहे. सुसाईड नोटमध्ये त्या इसमाने आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे नमूद केले होते. मी आधीच त्रासात आहे. आता आमच्याकडे कोणताही मार्ग नाही, असं त्याने नोटमध्ये लिहीलं होतं. अशाप्रकारे एक हसतं खेलतं, आनंदी कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय दिलीप चितारा हे त्यांच्या कुटुंबासह अंबाफळा हॉल प्रभातनगर सेक्टर-5 मध्ये भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अलका (वय 37), मुलगा खुश (वय 6) आणि मनवीर (वय 4) रहात होते. दिलीपने प्रथम मुलांना विष दिले, पत्नीचा गळा दाबला आणि नंतर स्वतःला गळफास लावून घेतला. माहिती मिळताच हिरणमग्री पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मात्र समोरचदिलीप चितारा यांचा मृतदेह फासावर लटकलेला होता, तर त्यांच्या पत्नी आणि मुलांचे मृतदेह तिथे पडले होते, समोरील दृश्य पाहून लोकांन धक्काच बसला. पोलिसांनी मृतदेह शवागारात पाठवले व त्यानंतर मृताच्या कुटुंबियांना माहिती दिली.

सुसाईड नोटमध्ये काय लिहीलं ?

दिलीपने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की, (त्याची) आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे. कोरोनानंतर आर्थिक परिस्थिती बिकट झाली. म्हणूनच तो हे पाऊल उचलत असल्याचंही त्याने नमूद केलं. दिलीपचे हिरणमग्री येथे एक जनरल स्टोअर होते. हे दुकानही भाड्याने घेतले होते असं पोलिसांनी सांगिीतलं.

घरमालकाला आली शंका

शुक्रवारी दिवसभर भाडेकरू दिलीपच्या घराच्या कोणतीही हालचाल झाली नाही. कोणीही बाहेर न आल्याने पहिल्या मजल्यावर राहणारे घरमालक रवी सचदेव यांना संशय आला. त्यांनी दार ठोठावले, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्यांनी पोलिसांना कळवले.

नातेवाईकांनी सांगितलं कारण

मृताचे काका मानक चितारा म्हणाले की, सुमारे 6 महिन्यांपूर्वी दिलीपने कर्जाबद्दल सांगितले होते. अशा परिस्थितीत त्यांनी त्यांना घर विकून कर्ज फेडण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी कधीही यावर चर्चा केली नाही. अलिकडेच काका दिलीपला भेटले, पण त्यांनी कर्जाचा उल्लेख केला नाही.

राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी.
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू.
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.