AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन मुलांना विष दिलं, पत्नीचाही दाबला गळा आणि त्यानेही … क्षणार्धात 4 जीव शांत !

Man Killled Family In Udaipur : उदयपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तेथे राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रथम आपल्या पत्नी आणि दोन निष्पाप मुलांची हत्या केली. नंतर त्याने स्वतःही पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने असं टोकाचं पाऊल का उचललं?

दोन मुलांना विष दिलं, पत्नीचाही दाबला गळा आणि त्यानेही ... क्षणार्धात 4 जीव शांत !
| Updated on: Jul 26, 2025 | 9:28 AM
Share

राजस्थानमधील उदयपूरमध्ये एका पीनते पत्नीची हत्या केल्यानंतर आत्महत्या करून सर्वस्व संपवले. या भयानक घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. पतीने प्रथम पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली. नंतर त्याने स्वतःही पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली असून ती वाचल्यावकर पोलिसदेखील सुन्न झाले. ही घटना हिरणमग्री पोलीस स्टेशन परिसरातील प्रभात नगर येथील आहे. सुसाईड नोटमध्ये त्या इसमाने आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे नमूद केले होते. मी आधीच त्रासात आहे. आता आमच्याकडे कोणताही मार्ग नाही, असं त्याने नोटमध्ये लिहीलं होतं. अशाप्रकारे एक हसतं खेलतं, आनंदी कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय दिलीप चितारा हे त्यांच्या कुटुंबासह अंबाफळा हॉल प्रभातनगर सेक्टर-5 मध्ये भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अलका (वय 37), मुलगा खुश (वय 6) आणि मनवीर (वय 4) रहात होते. दिलीपने प्रथम मुलांना विष दिले, पत्नीचा गळा दाबला आणि नंतर स्वतःला गळफास लावून घेतला. माहिती मिळताच हिरणमग्री पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मात्र समोरचदिलीप चितारा यांचा मृतदेह फासावर लटकलेला होता, तर त्यांच्या पत्नी आणि मुलांचे मृतदेह तिथे पडले होते, समोरील दृश्य पाहून लोकांन धक्काच बसला. पोलिसांनी मृतदेह शवागारात पाठवले व त्यानंतर मृताच्या कुटुंबियांना माहिती दिली.

सुसाईड नोटमध्ये काय लिहीलं ?

दिलीपने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की, (त्याची) आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे. कोरोनानंतर आर्थिक परिस्थिती बिकट झाली. म्हणूनच तो हे पाऊल उचलत असल्याचंही त्याने नमूद केलं. दिलीपचे हिरणमग्री येथे एक जनरल स्टोअर होते. हे दुकानही भाड्याने घेतले होते असं पोलिसांनी सांगिीतलं.

घरमालकाला आली शंका

शुक्रवारी दिवसभर भाडेकरू दिलीपच्या घराच्या कोणतीही हालचाल झाली नाही. कोणीही बाहेर न आल्याने पहिल्या मजल्यावर राहणारे घरमालक रवी सचदेव यांना संशय आला. त्यांनी दार ठोठावले, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्यांनी पोलिसांना कळवले.

नातेवाईकांनी सांगितलं कारण

मृताचे काका मानक चितारा म्हणाले की, सुमारे 6 महिन्यांपूर्वी दिलीपने कर्जाबद्दल सांगितले होते. अशा परिस्थितीत त्यांनी त्यांना घर विकून कर्ज फेडण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी कधीही यावर चर्चा केली नाही. अलिकडेच काका दिलीपला भेटले, पण त्यांनी कर्जाचा उल्लेख केला नाही.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.