Mansukh Hiren Death Case: मनसुख हिरेन प्रकरणी ATS ची धक्कादायक थेअरी, कोड्यात टाकणारे 5 मुद्दे

मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक अर्थात ATS करत आहे.

Mansukh Hiren Death Case: मनसुख हिरेन प्रकरणी ATS ची धक्कादायक थेअरी, कोड्यात टाकणारे 5 मुद्दे
Mansukh Hiren
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 11:28 AM

मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक अर्थात ATS करत आहे. ATS ने आपल्या प्राथमिक अहवालात हिरेन यांच्या हत्येचा संशय व्यक्त केलाय. ATS ने आतापर्यंत जो तपास केलाय त्या माहितीच्या आधारे हा संशय व्यक्त केल्याचं एका ATS अधिकाऱ्यांने सूत्रांना सांगितलं. (Mansukh Hiren Death Case ATS theory 5 Shocking points)

काय आहेत ATS चे 5 धक्कादायक खुलासे…??

1) मनसुख हिरेन दोन मोबाईल वापरत होते. मृत्यूच्या अगोदर 30 मिनिटे दोन्ही मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणांहून स्वीच ऑन आणि स्वीट ऑफ करण्यात आले. एका मोबाईचं लोकेशन वसईतलं मांडवी तर एकाचं लोकेशन तुंगारेश्वर… या दोन्ही ठिकाणांचं अंतर साधारण 8 ते 10 किमीचं आहे. त्यांचा मृत्यू त्यांचे दोन्ही मोबाईल स्वीच ऑफ आणि स्वीच ऑन होण्याआधी झाला असावा. मग त्यांचा मृतदेह तुंगारेश्वरला नेण्यात आला असावा, असा एटीएसला संशय आहे. हे दोन्ही मोबाईल मुद्दामहून वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑन आणि ऑफ करण्यात आले कारण त्यांना पोलिस आणि हिरेन कुटुंबाला शोधकार्यात व्यक्त ठेवायचे होते.

2) आत्महत्या करणारी व्यक्ती कोरोनाच्या भीतीने तोंडावर मास्क किंवा रुमाल लावते, हे न पटणारे आहे. त्यामुळे हिरेन यांची हत्या झाल्याचा सशय बळावतो आहे, असं एटीएसच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

3) हिरेन यांच्या तोंडात रुमालाचे बोळे होते कारण त्यांच्या तोंडावाटे त्यांच्या शरीरात पाणी जाऊ नये. जर पाणी गेलं असतं तर काही वेळातच त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगला असता. उशीरा त्यांच्या शरीरात पाणी जावं आणि मृतदेह जास्त काळ त्यांचा पाण्यात रहावा जेणेकरुन मारेकऱ्यांना पळण्यास जास्त वेळ लागेल आणि पुरावेही नष्च करण्यास वेळ मिळेल.

4) एटीएसला सगळ्यात मोठा संशय आहे की हिरेन यांचा मृतदेह पाण्यात फेकण्याआधी त्यांचा मृत्यू 12 ते 16 तास अगोदर झालेला असावा. तसंच ज्या ठिकाणी त्यांचा मृतहेद मिळाला तिथे तो काही तास अगोदर फेकण्यात आला असावा.

5)हिरेन यांना अगोदर मारण्यात आलं असावं आणि त्यानंतर त्यांचा मृतहेद मुंब्र्याच्या रेतीबंदर येथे फेकून देण्यात आला असावा. दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल ऑन ऑफ करण्याचं तंत्र हा तपास यंत्रणा भरकटवण्यासाठी केलेला भाग असावा, असा संशय ATS ला आहे.

(Mansukh Hiren Death Case ATS theory 5 Shocking points)

हे ही वाचा :

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास ‘एनआयए’ करणार; हिरेनप्रकरण एटीएसकडेच

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

Video: जिथं ‘त्या’ स्कॉर्पिओच्या मालकानं आत्महत्या केली तिथला व्हिडीओ जशास तसा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.