AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी वस्तू, कपडे तपासले, अचानक एक नंबर सापडला अन्… वडिलांनी मुलीच्या आत्महत्येचा असा लावला छडा; धक्कादायक माहिती काय?

जून महिन्यात पिंपरी चिंचवडमधील अवघ्या 12 वर्षांच्या मुलीने गळफास लावून घेत आयुष्य संपवलं होतं. तेव्हापासून तिचे वडील प्रचंड अस्वस्थ होते. मुलीने असं टोकाचं पाऊल का उचललं ? याचा शोध लावण्याचा चंगच त्यांनी बांधला.

आधी वस्तू, कपडे तपासले, अचानक एक नंबर सापडला अन्... वडिलांनी मुलीच्या आत्महत्येचा असा लावला छडा; धक्कादायक माहिती काय?
क्राईम न्यूज
| Updated on: Oct 08, 2024 | 1:50 PM
Share

विद्येचे माहेर अशी ओळख असलेल्या पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या स्मार्ट सिटी पिंपरी- चिंचडवडमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाच महिन्यांपूर्वी,6 जून रोजी पिंपरी चिंचवडमध्ये अवघ्या 12 वर्षांच्या मुलीने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं होतं. तिने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आणि प्रचंड खळबळ माजली. मात्र आपल्या मुलीच्या अक्समात मृत्यू तिच्या कुटुंबियांलब तिचे वडीलही प्रचंड हादरले. आपल्या मुलीने एवढं टोकाचं पाऊलं का उचललं ? हा प्रश्न त्यांचं मन पोखरत होता. अखेर पोलिसांनी त्यांनीच आपल्या मुलीच्या मृ्त्यूचे गूढ उकलतं तिच्या मृत्यूसाठी कारणमीभूत ठरलेल्या खऱ्या आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन तरूणांना अटक केली आहे. क्षितिज पराड आणि तेजस पठारे असे आरोपींचे नाव असून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

असा लावला आरोपींचा शोध

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरात राहणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीने 6 जून 2024 या दिवशी संध्याकळी घरात गळफास लावून आत्महत्या केली. एवढ्या लहान मुलीने आयुष्य संपवल्याने एकच खळबळ माजली. प्रचंड धक्का बसलेले तिचे कुटुंबिय शोकाकुल अवस्थेत होते. पण त्या मुलीचे वडील खूप अस्वस्थ होते. आपल्या मुलीने आत्महत्या का केली ? घरात तिला कोणी काही बोललं नाही, ओरडलं नाही मग तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं ? या प्रश्नांचा भुंगा त्यांचंम मन आणि डोक पोखरत होता. नेमकं काय घडलं? याचा शोध लावायचा चंग वडिलांनी बांधला आणि शोध सुरू केला.

त्यांनी त्यांच्या मृत मुलीच्या वस्तू तसेच कपडे शोधायला, त्यातून काही सुगावा मिळतोय का हे तपासायला सुरूवात केली. त्याचदरम्यान त्यांना त्या मुलीच्या एका ड्रेसच्या खिशात एक चिठ्ठी साप़डली, त्यावर एक मोबाईल नंबर लिहीलेला होता. पण घरातल्यांपैकी, ओळखीच्यांपैकी तो नंबर कोणाचाच नव्हता. तिथेच वडिलांना संशय आला. तेव्हा त्यांनी प्रयत्न करून आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता दोन मुलं वारंवार त्यांच्या मुलीच्या आजूबाजूला घुटमळत असल्याचे दिसलं. यामुळे आरोपी हे मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होते. तिचा लैंगिक छळ करत होते, असा आरोप करत त्या मुलीच्या कुटुंबियांनी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली,असा आरोपही त्यांनी लावला.

त्यानुसार, भोसरी पोलिसांनी देखील तात्काळ पॉक्सोचा गुन्हा दाखल करून क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे या दोघांना अटक केली. मात्र मुलीच्या आत्महत्येनंतरच पोलिसांनी काही तपास का केला नाही, दु:खात असलेल्या वडिलांनाच का तपास करावा लागला, असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी