Mumbai Crime News : वरळीतील बीडीडी चाळीत कोयता हल्ला, आरोपीने पोलिस स्टेशन गाठलं, तेवढ्यात…

मुंबईतल्या वरळीत काल एक धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपीने पोलिस स्टेशन गाठलं आणि झालेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आहे. पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.

Mumbai Crime News : वरळीतील बीडीडी चाळीत कोयता हल्ला, आरोपीने पोलिस स्टेशन गाठलं, तेवढ्यात...
mumbai police
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 16, 2023 | 8:42 AM

मुंबई : देशात काल १५ ऑगस्ट मोठ्या उत्साहात सुरु असताना वरळीतील बीडीडी चाळीत (worli bdd chawl crime news in marathi) एक भयानक घटना घडली आहे. काल रात्री आठ वाजता एका व्यक्तीने ओळखीच्या एका व्यक्तीवरती कोयत्याने वार केले आहेत. ज्यावेळी त्या व्यक्तीवरती आरोपीने हल्ला केला. त्यावेळी आरोपी व्यक्ती जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये (mumbai police) गेली आणि झालेला सगळा प्रकार सांगितला आहे. जखमी व्यक्तीला केईएम रुग्णालयात (KEM Hospital) घेऊन जाण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. आरोपीवरती गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु असून, शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. विनोद साळुंखे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

नेमकं काय झाल ?

मुंबईच्या वरळी परिसरात एका व्यक्तीच्या खून करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रात्री ८ वाजेच्या सुमारास बीडीडी चाळ क्रमांक ५ येथे खून करण्यात आला आहे. आरोपीने कोयत्याने मृतकावर वार केले. त्यामुळे तो जखमी झाला, मात्र उपचारासाठी केईएम रूग्नालयात नेण्यात आले होते. पण ती व्यक्ती जागीच मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे .

अंतर्गत वादातून खून झाला

अंतर्गत वादातून खून झाला असल्याची माहिती आरोपीने स्वत:हून पोलिसांना पोलिस स्टेशनमध्ये सांगितली आहे. ठाण्यात हजर झाला असी माहिती आहे. उपचारासाठी केईएम रूग्नालयात नेण्यात आले होते. त्या व्यक्तीला जागीचं मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलीस तैनात असून पुढील कायदेशीर कारवाई शुरू आहे. मात्र या घटनेचं नेमकं कारण काय होतं ? या संदर्भात अधिक तपास शुरू आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे विनोद साळुंखे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर आरोपीचं नाव गिरीश जाधव असून दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते अस म्हटलं जातंय.