
दीड महिन्यापूर्वी बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. अक्षय शिंदे नावाच्या आरोपीने केलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. बदलापूरकर प्रचंड संतप्त झाले होते. तब्बल दहा तास लोकांनी रेल्वे रोखून आंदोलन केले होते. जनतेची एकच मागणी होती. आरोपीला जाहीर फाशी द्या… सरकारच्या प्रतिनिधींनी अनेक वेळा चर्चा केली. परंतु लोक आपल्या मागणीवर ठाम होते. सरकारकडून वेगाने पावले उचलत एसआयटीची स्थापना करण्यात आली. जलदगती न्यायालयाची निर्मिती करण्यात आली. हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे दिला. त्यानंतर जनतेचे समाधान झाले नाही. लोकांनी जाहीर फाशीची मागणी लावून धरली होती. अखेर दीड महिन्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये खात्मा झाला. त्यानंतर बदलापूरमध्ये फटके फोडले गेले. पेढे वाटले गेले अन् सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली शिंदे सरकारच्या योगी पॅटर्नची…स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी शिंदे सरकारने हे ठरवून केल्याचा आरोप विरोधक...