AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Police : ‘पोलिसांवर हात उगारणं म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या कानशिलात मारल्यासारखं’

पोलीस शिपाई कांबळे हे भांडण सोडवण्यासाठी गेले. तेव्हा अनिल घोलप यानं पोलिसांसोबत हुज्जत घातली होती. इतकंच काय तर या आरोपीनं पोलिसांच्या कानशिलात लगावली होती.

Mumbai Police : 'पोलिसांवर हात उगारणं म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या कानशिलात मारल्यासारखं'
महत्त्वपूर्ण निकालImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 22, 2022 | 9:45 AM
Share

मुंबई : पोलिसांवर (Mumbai Police) होणारे हल्ले काही नवे नाहीत. मात्र पोलिसांवर (Attack on Maharashtra Police) होणारे हल्ले हे कायदा सुव्यवस्थेवर झालेल्या हल्लासारखे आहेत, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. पोलिसावर हात उचलणं कायदा सुव्यवस्थेच्या कानशिलात मारल्यासारखं असल्याचं कोर्टानं म्हटलंय. मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai session Court) एक सुनावणी पार पडली. त्यादरम्यान, मुंबई सत्र न्यायालयानं हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. तसंच पोलिसावर हात उगारणाऱ्याला चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 11 हजार रुपयांच्या दंड ठोठावण्यात आला आहे. चकीत करणारी बाब म्हणजे तब्बल 11 वर्षानंतर मुंबई सत्र न्यायालयानं आरोपीला शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या निकालामुळे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसावर हात उचलणाऱ्यांना आतातरी चाप बसतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

नेमकं प्रकरण कधीच?

मुंबई सत्र न्यायालयात 2011 सालच्या एका प्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. 10 मार्च 2011 रोजी सायन रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या एका एटीएम जवळ भांडण सुरु होतं. दोघांमध्ये सुरु असलेल्या भांडणावर पोलिसांची नजर पडली.

पाहा मोठी बातमी :

यावेळी कर्तव्यावर असलेल्या हवालदार कल्पेश मोकल आणि पोलीस शिपाई कांबळे हे भांडण सोडवण्यासाठी गेले. तेव्हा अनिल घोलप यानं पोलिसांसोबत हुज्जत घातली होती. इतकंच काय तर या आरोपीनं पोलिसांच्या कानशिलात लगावली होती.

पोलिसांवर हात उगारल्याप्रकरणी घोलप यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गेल्या दहा वर्षांपासून मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला असून आरोपीला कोर्टानं दणका दिला आहे.

पोलिसांवरील हल्ले कधी थांबणार?

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या वाहतूक पोलिसांवर हल्ले होत असल्याचे व्हिडीओ समोर आले होते. एका वाहतूक पोलिसाला महिलेनं मारहाण केली होती. तर एका पोलिसाला वाहन चालकानं थेट बोनेटवर बसवून, पोलिसांचा जीव वेठीस ठरला होता. दरम्यान, आता पोलिसांनी याप्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पोलिसांवर हात उगारणं हे कायद्याच्या कानशिलात लगावण्यासारखं असल्याचं कोर्टानं म्हटलंय. यानंतर तरी पोलिसांवरील हल्ले थांबतात का, हे पाहणं आता महत्त्वाचंय.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.