AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime : तिचं 2 महिन्यापूर्वी लग्न झालं, ती माहेरी आली, त्याने अखेर 2 जीव संपवले

मनापासून प्रेम केलेल्या जोडीदाराला तिच्या लग्नानंतर विसरून जावं लागतं. परंतु काही प्रेमवीरांना सहन होत नाही. अशाच प्रकारचं साताऱ्यातून एक प्रकरण समोर आलंय.

Crime : तिचं 2 महिन्यापूर्वी लग्न झालं, ती माहेरी आली, त्याने अखेर 2 जीव संपवले
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 27, 2023 | 7:57 PM
Share

सातारा : प्रेम आंधळं असतं असं बोललं जातं, कारण प्रेयसी आणि प्रियकर दोघेही एकमेकांसाठी कोणताही निर्णय घेतात. मात्र अनेकवेळा घरी सांगता येत नसल्याने काहींची प्रेम कहानी अधुरी राहते. मनापासून प्रेम केलेला जोडीदार डोळ्यादेखत दुसऱ्या कोणाचा होताना पाहावं लागतं. त्यामुळे लग्नानंतर सर्व काही विसरून जावं लागतं. परंतु काही प्रेमवीरांना हे सहनच होत नाही त्यांतर तो किंवा दोघे मिळून जो काही निर्णय घेतात तो सर्वांना थक्क करून टाकणारा असतो. अशातच साताऱ्यातून एक प्रकरण समोर आलं ज्यामुळे माण तालुका हादरून गेला आहे. (Crime News Maharashtra)

नेमकं काय आहे प्रकरण?

सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यामधील ही घटना आहे. प्रेमवीराने एका नवविवाहितेला संपवलं आहे. इतकंच नाहीतर त्यानंतर त्याने गळफास घेत आपलंही जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. माण तालुक्यामधील वांझोळी गावामधील ही घटना आहे. नवविवाहित तरूणीचं नाव स्नेहल वैभव माळी असं आहे. तर आत्महत्या करणाऱ्या आरोपीचं नाव दत्तात्रय सुरेश माळी असं आहे.

दत्तात्रय माळी आणि स्नेहल माळीचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र स्नेहलच्या घरच्यांनी दोन महिन्यांपूर्वी तिचा विवाह लावून दिला होता. लग्नानंतर स्नेहल आपल्या माहेरी म्हणजेच वांझोळीत आली होती. दोघांचेही घर अगदी जवळच होते, दत्तात्रयने संध्याकाळच्या सुमारास स्नेहलला आपल्या घरी बोलावून घेतलं. जेव्हा स्नेहल आली त्यावेळी त्याच्या घरात कोणी नव्हतं, आरोपी दत्ताने याचाच फायदा घेत तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. स्नेहल रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जाग्यावरच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी दत्तात्रयने स्नेहला संपवलं त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

लग्नानंतर दोन महिन्यांनी प्रेयसी भेटायला आली, त्याने आधी तिला संपवलं नंतर स्वतःही...

दरम्यान, या घटनेची माहिती औंध आणि पुसेसावळी पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह एकाच घरात आढळून आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवले. या घटनेची नोंद रात्री उशिरा औंध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर