AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावतीमध्ये भीषण अपघात! 3 जण जागीच ठार, नेमका कसा घडला अपघात?

राज्यात रस्ते अपघातांचं प्रश्न पुन्हा ऐरणीवर! अमरावतीच्या वरुड तालुक्यात तिघांवर काळाचा घाला

अमरावतीमध्ये भीषण अपघात! 3 जण जागीच ठार, नेमका कसा घडला अपघात?
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Nov 11, 2022 | 12:32 PM
Share

अमरावती : अमरावती जिल्ह्यात एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक (Amravati Accident News) दिली. या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. इतकंच नव्हे तर दुचाकीवरील तिघा जणांचा जागच्या जागीच जीव (Bike accident) गेलाय. हा भीषण अपघात अमरावती जिल्ह्यातील वरड तालुक्यात घडला. या अपघातप्रकरणी पोलिसांकडून (Amravati crime news) आता तपास केला जातो आहे. अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नेमकी कुणी या दुचाकीला धडक दिली, याचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरड तालुक्यात तीन रहिवासी दुचाकीवरुन जात होते. दुचाकीवरुन जात असतेवेळी पंढरी येथे एक भरधाव वाहन काळ बनून आलं. या दुर्दैवी अपघातात झालेल्या तिघांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जाते आहे.

वरड तालुक्यातील अमडापूर इथं राहणारे तीन युवक दुचाकीने रोजगारासाठी जात होते. किसन शिवनाथ लांगापुरे, वय 45, मनोहर रामराव लांगापुरे, वय 40 आणि राजेश रामदार शिंदे, वय 40 अशी तिघा मृत तरुणांची नावे आहेत.

सकाळी सात-सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घडना घडली. या अपघाताची तीव्रता इतकी जबर होती की तिघांचेही मृतदेह रस्त्याच्या कडेला पडले होते. यातील दोघेजण दूरवर फेसले गेले होते. तर एक तरण चक्कचूर झालेल्या दुचाकीच्या शेजारीच जखमी अवस्थेत पडला होता. नेमका हा अपघात घडला कसा, याबाबतही सखोल तपास केला जातोय.

तिघा तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या अपघातप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सध्या याप्रकरणी पुढील तपास केला जातोय. कामाच्या शोधात दुचाकीवरुन जायला निघालेल्या तिघा तरुणांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय.

Follow Us
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.