AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : सट्ट्यामुळे कर्जबाजारी झाले, मग उधारी चुकवू न शकल्याने व्यापाऱ्यांना थेट…

दोघे तरुण व्यापारी अचानक बेपत्ता झाले. पोलीस दोघांचा शोध घेत होते. पण शोध सुरु असतानाच जे समोर आलं त्याने कुटुंबीयांना धक्काच बसला.

Nagpur Crime : सट्ट्यामुळे कर्जबाजारी झाले, मग उधारी चुकवू न शकल्याने व्यापाऱ्यांना थेट...
उधारीच्या पैशाच्या वादातून दोघा व्यापाऱ्यांना संपवले
| Edited By: | Updated on: Jul 27, 2023 | 12:04 PM
Share

नागपूर / 27 जुलै 2023 : उधारीच्या पैशाच्या वादातून दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करत त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. हत्या करुन दोन्ही मृतदेह नदीत टाकण्यात आले होते. दोन्ही मृतदेह नदीतून बाहेर काढून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सिताबर्डी पोलीस आणि सोनेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस तपासाअंतीच हत्या नेमकी कुणी केली? आणि नक्की पैशाच्या वादातूनच हत्या झाली की अन्य कारणातून याबाबत माहिती मिळेल.

दोघेही बेपत्ता होते, मग मृतदेहच आढळले

दोन्ही मयत व्यापारी अचानक बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी सिताबर्डी पोलीस आणि सोनेगाव पोलिसात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. पोलीस दोन्ही बेपत्ता व्यापाऱ्यांचा शोध घेत होते. मात्र आज सकाळी तळेगाव येथील नदीपात्रात दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

उधारीच्या पैशातून हत्याचा झाल्याची प्राथमिक माहिती

दोघा व्यापाऱ्यांना सट्टा खेळण्याचा नाद होता. सट्ट्यासाठी त्यांनी आरोपींकडून उधार पैसे घेतले होते. मात्र हे पैसे परत न करु शकत नसल्याने आरोपींनी आधी त्यांचे अपहरण केले. मग गोळ्या झाडून हत्या केली आणि मृतदेह तळेगाव येथील नदीपात्रात फेकल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात मिळाली. मात्र नक्की याच कारणातून ही हत्या झाली की अन्य कारण आहे? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी अज्ञात आरोपींचाही शोध सुरु केला आहे.

Follow Us
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.