AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 लाखांचं लाच प्रकरण, संशयित आरोपीच्या घरात किती घबाड? पाहून धक्काच बसेल…

भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोरीच्या कारवाईची धूळ बसत नाही तोच पुन्हा एक मोठी कारवाई नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

20 लाखांचं लाच प्रकरण, संशयित आरोपीच्या घरात किती घबाड? पाहून धक्काच बसेल...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 31, 2023 | 11:09 AM
Share

नाशिक : नाशिकमधील लाचखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मार्च महिण्यात मोठ्या प्रमाणात लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्याचे समोर आले आहे. यामध्ये भूमी अभिलेख कार्यालयात चर्चेत असतांना नुकतीच नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निबंधक कार्यालयातील सहाय्यक निबंधक आणि त्याच्या सहकाऱ्याला तब्बल 20 लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. त्यामध्ये त्यांना न्यायालयात हजर केले असतांना 1 एप्रिल पर्यन्त पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्याकडे घरात लाखो रुपयांची रोकड सापडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून सिन्नरमध्ये उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

नाशिकच्या सिन्नर निबंधक कार्यालयातील सहायक निबंधक रणजीत महादेव पाटील आणि वरिष्ठ लिपिक प्रदीप अर्जुन वीरनारायण यांना अटक केली आहे. वाडिलांवरील सावकारी कारवाई टाळण्यासाठी मुलाकडे 20 लाखांच्या लाचेची मागणी केली होती.

सिन्नर कार्यालयात ह्या लाचेची मागणी केली होती. यामध्ये सिन्नर येथील कार्यालयात ही लाच न घेता नाशिकच्या मुंबई नाका परिसरात ही लाच घेण्याचे ठरले होते. त्यानुसार गाडीत बसवून तक्रार दाराकडून लाच घेण्यासाठी शहरभर फिरवल्याचे समोर आले आहे.

लाच दिल्यानंतर काही मिनिटांतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे शहरात बुधवारी झालेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात या दोघांच्या घरात पैसे सापडल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अधिकचा तपास केला जात असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. लाच मागितल्यास थेट 1064 या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन एसीबीच्या वतीने करण्यात आले आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.