AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यावर चित्रपटाला लाजवेल असा थरार रंगला होता, ‘त्या’ बहुचर्चित प्रकरणाचा अखेर उलगडा, काय घडलं?

नाशिकच्या कार्बन नाका परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. त्यामध्ये मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

रस्त्यावर चित्रपटाला लाजवेल असा थरार रंगला होता, 'त्या' बहुचर्चित प्रकरणाचा अखेर उलगडा, काय घडलं?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 31, 2023 | 8:56 AM
Share

नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सातपूर परिसरातील कार्बन नाका परिसरामध्ये भर दिवसा गोळीबार आणि कोणत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. चित्रपटाला लाजवेल अशा स्वरूपाचा थरार सीसीटीव्ही कॅमेरा झाला होता आणि त्यानंतर हा धक्कदायक प्रकार समोर आला होता. या घटनेने संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली होती. पूर्ववैमन्यस्यातून ही घटना घडल्याचं नाशिक शहर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. मात्र, या घटनेतील इतिहास पोलिसांनाही चक्रावून टाकणारा असून मुळशी पॅटर्न या चित्रपटातील काही दृश्यांना साजेस आहे. त्यामुळेच या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. गेले अनेक दिवस यातील संशयित आरोपी फरार होते. त्यांचा शोध घेण्यास पोलिसांना यश येत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती.

नाशिकच्या कार्बन नाका परिसरातील गोळीबार आणि प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना गेले अनेक दिवस संशयित आरोपी हाती लागत नव्हते. हल्ला झालेल्या तरुणाने पोलिसात दिलेल्या फिर्यादी वरुण प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपन जाधव आणि राहुल पवार हे दोघे कार्बन नाका परिसरातून त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते. त्याच वेळेला आशिष जाधव, भूषण पवार, रोहित अहिरराव, गणेश जाधव, किरण चव्हाण आणि सोमनाथ झांजर यांनी दुसऱ्या चारचाकी पाठलाग करत धडक दिली होती.

या धडकेनंतर तपन जाधव याणणे पळ काढला तर राहुल जाधव हा कारमध्ये होता. त्याच्यावर संशयित आरोपी यांनी गोली झाडली आणि त्यानंतर हातातील कोयत्याने वार केले होते. त्यानंतर भरदिवसा भर रस्त्यात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.

गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी आशिष जाधव आणि फिर्यादी राहुल पवार हे दोघे सराईत गुन्हेगार आहे. दोन्ही जनामध्ये भावांच्या हत्येवरुण पुर्ववैमन्यस निर्माण झाले आहे. त्यामुळे ही घटना घडल्याचे पोलिस तपासात समोर आले असून शहर पोलिस अधिकचा तपास करत आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.