AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्रांनी भेटीसाठी बोलावलं पण आधीच प्लॅन ठरला होता, बाचाबाची झाली आणि नंतर जे घडलंय ते भयंकर आहे, नेमकं काय घडलं?

नाशिक शहरातील गुन्हेगारी फोफावत चालली आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे विद्यार्थी दशेतील मुलंही गुन्हेगारी सारखं पाऊल उचलत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मित्रांनी भेटीसाठी बोलावलं पण आधीच प्लॅन ठरला होता, बाचाबाची झाली आणि नंतर जे घडलंय ते भयंकर आहे, नेमकं काय घडलं?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 29, 2023 | 12:01 PM
Share

नाशिक : नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांची कंबर कसलेली असतांना शहरातील काठेगल्ली परिसरात प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून शहरात पोलिस अधिकाऱ्यांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. यामध्ये शहरातील गुन्हेगारांना चांगलेच रडारवर घेतलेले असतांना द्वारका परिसरातील काठे गल्लीमध्ये एका टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. पंचवीस वर्षीय तरुणावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला असून गुप्तीने वार केले आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

सातपुर येथील आशुतोष भोसले हा तरुण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये काही आशुतोष ला त्याच्या मित्रांनी संध्याकाळी भेटण्यासाठी काठे गल्लीत बोलावले होते. त्यावरून आशुतोष भेटायला आला होता. त्यावेळी आशुतोष सोबत मित्रांनी वाद घातला.

आशुतोषवर हल्ला करण्याचा आधीच कट रचून ठेवला होता. त्यामध्ये आशुतोषच्या दंडावर गुप्तीने वार करण्यात आले आहे. यामध्ये आशुतोष गंभीर जखमी झाला असतांना तो खाली पडला होता. नागरिकांनी तो पडलेला अवस्थेत पाहून पोलिसांना कळविले होते.

त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोर सर्व तरुण पळून गेले होते. भद्रकाली पोलिसांनी याबाबत गुन्हा दखल करून घेत पुढील तपास सुरू केला आहे. या हल्ल्यातील संशयित आरोपीत अठरा वर्षाखालील मुलं असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगरी वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.

या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाची दंडाची मोठी रक्तवाहिनी तुटली आहे. या घटनेने काठे गल्ली परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असून अधिकचा तपास केला जात आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.