कौटुंबिक कामासाठी चालले होते, मात्र जिवंत घरी परतलेच नाही, कुटुंबासोबत नेमके काय घडले?

| Updated on: Feb 24, 2023 | 2:31 PM

कौटुंबिक कामासाठी साहू परिवार अर्जुनी येथे आला होता. यावेळी भाटापारा मार्गावर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत पिकअप व्हॅनचा चक्काचूर झाला. गाडीतील एकाच कुटुंबातील 11 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 12 सदस्य गंभीर जखमी आहेत.

कौटुंबिक कामासाठी चालले होते, मात्र जिवंत घरी परतलेच नाही, कुटुंबासोबत नेमके काय घडले?
सोलापुरात कंटेनर आणि बाईक अपघातात एक ठार
Image Credit source: socialmedia
Follow us on

रायपूर : कौटुंबिक कामासाठी चाललेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना छत्तीसमधील रायपूरमध्ये उघडकीस आली आहे. ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाल्याने एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू झाला, तर 12 कुटुंबातील अन्य जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात पिकअप व्हॅनचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला. छत्तीसगडमधील भाटापारा मार्गावर बलौदा बाजार येथे ही दुर्दैवी घटना घडली.

ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक

कौटुंबिक कामासाठी साहू परिवार अर्जुनी येथे आला होता. यावेळी भाटापारा मार्गावर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत पिकअप व्हॅनचा चक्काचूर झाला. गाडीतील एकाच कुटुंबातील 11 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 12 सदस्य गंभीर जखमी आहेत. घटनेमुळे भाटापारा मार्गावर एकच गोंधळ उडाला.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले

अपघाताची स्थानिक पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळतचा स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर अपघातात मृत्यू झालेल्या 11 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

हे सुद्धा वाचा