AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?

नुसती धावपळ… आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्… शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Jul 29, 2026 | 6:06 PM
Share

भोपाळमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुग उत्पादनासंदर्भातील मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. या आंदोलनामुळे काही भागातील वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.

भोपाळमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुग उत्पादनासंदर्भातील मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. या आंदोलनामुळे काही भागातील वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, किसान मोर्चाने गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. आंदोलनादरम्यान काही आंदोलक थेट बसवर चढल्याचे तसेच काही वाहनांचा मार्ग अडवल्याचे दिसून आले. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनास्थळी पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी तैनात असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

या आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे दिसत असून, प्रशासनाकडून यावर काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 29, 2026 06:04 PM

Follow Us