AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर आरोपींना जन्मठेप… अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे हत्याकांडाचा निकाल लागला…

मालेगाव जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०११ मध्ये झालेल्या जळीतकांडाचा तब्बल ११ वर्षांनी निकाल लागला आहे.

अखेर आरोपींना जन्मठेप... अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे हत्याकांडाचा निकाल लागला...
Image Credit source: - Upper Collector Yashwant Sonwane ultimately sentenced to life imprisonment for the accused in the arson case
| Updated on: Sep 08, 2022 | 3:52 PM
Share

नाशिक : २०११ मध्ये संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या घटनेचा अखेर निकाल आज लागलाय. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे ( YASHWANT SONAVANE ) यांचे जळीतकांड झाले होते. त्यावर आज नाशिक जिल्हयातील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालय मालेगाव ( MALEGAON ) येथे सुनावणी होती. त्यादरम्यान मुख्य आरोपी पोपट शिंदेसह ( POPAT SHINDE ) तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपीचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकूण १५ आरोपींचा समावेश होता. उर्वरित काही आरोपींवर मोक्काच्या कारवाईची मागणी पोलिसांनी केलेली होती.

मालेगाव जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०११ मध्ये झालेल्या घटनेचा तब्बल ११ वर्षांनी निकाल लागला आहे.

२५ जानेवारी २०११ रोजी इंधन माफियांनी छापा मारण्यासाठी गेलेले अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळून ठार मारले होते. यामध्ये एकूण पाच जणांना अटक करण्यात आली होती.

मुख्य आरोपी पोपट शिंदे ही देखील या प्रकरणात जळाले गेले होते त्यांनंतर त्याचा मृत्यू झाला होता. तर कुणाल शिंदे हा त्यावेळी अल्पवयीन होता. याशिवाय मच्छिंद्र सुवडकर, राजू शिरसाठ आणि अजय सोनवणे हे आरोपी होते. याच तिघांना आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मनमाड जवळ पानेवाडी येथे अनेक इंधन कंपन्या आहेत. त्याचाच फायदा घेऊन अनेक इंधन माफियांचा परिसरात वावर असतो. पानेवाडी गावाजवळ अनेकांनी त्यावेळी हॉटेल सुरू करून त्याआडून इंधनचा काळाबाजार केला जात होता.

इंधन माफियांची कुणकुण अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना लागल्याने त्यांनी शिंदे यांच्या हॉटेलवर धाड टाकली होती. याचवेळी आरोपींनी सोनवणे यांच्यावर इंधन टाकून जळाले होते त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेला आज जवळपास ११ वर्षे उलटून गेलेले असतांना आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे अधिकारी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.