
Crime : लग्न ठरल्यावर साखरपुडा अरेंज वाल्यासोबत आणि मुलगी आपल्या लवरसोबत फरार झाल्याची अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत. काहीवेळा जवळचा मित्रच धोका देत काहींच्या गर्लफ्रेंडला पळवतात. अशातच एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. कलियुगामध्ये कधी काही घडेल हे काही सांगता येत नाही. एका युवकाची गर्लफ्रेंड दुसऱ्या कोणासोबत नाहीतर त्याच्या वडिलांसोबतच पळून गेली.
कमलेश असं वडिलांचं नाव असून ते आपल्या मुलासह औरैया येथील कानपूरच्या चकेरी भागात कामाच्या शोधात आले होते. कमलेश यांचा मुलगा घर बांधण्याचे काम करायचा. यादरम्यान तिथेच राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीवर प्रेम होतं. दोघांचेही प्रेम संबंध सुरू असतात.
काही अंतरावर राहत असल्याने तरूणी तिच्या प्रियकराला भेटायला जायची. मात्र तो कामावर जात असल्याने ती घरी असलेले त्याचे वडिल कमलेशसोबत गप्पा मारत बसायची. कोणाला काही संशयही आला नाही. कोणालाही विश्वास बसणार नाही पण कमलेश आणि तरूणी एक दिवस घरातून पळून गेले.
मुलीच्या घरच्यांना ती कमलेशच्या मुलावर संशय होता मात्र तो घरीच असायचा. त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी त्याला काही विचारलं नाही. अपहरणाची तक्रार दाखल केली. मार्च 2022 मध्ये मुलगी कमलेशसोबत पळून गेली होती. मुलगी कुठे गेली याचा कोणताही सुगावा पोलिसांना मिळू शकला नाही.
पोलिसांनी आपला तपास सुरू केला होता. सर्व धागे दोरे शोधले आणि पोलिसांना त्यांचा पत्ता लागलाच. कमलेश हा तरुणीसोबत दिल्लीत राहत होता आणि एका कारखान्यात काम करत होता. उत्तर प्रदेशमधील कानपूरमधील ही घटना आहे.