AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेची फी नको, प्लास्टिकचा कचरा द्या! जेवण, पुस्तकं, स्टेशनरीही फ्री घ्या…. आहे कुठे ही शाळा?

पद्मपाणी ही शाळा 2014 मध्ये सुरु झाली. सध्या शाळेत पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवलं जातं

शाळेची फी नको, प्लास्टिकचा कचरा द्या! जेवण, पुस्तकं, स्टेशनरीही फ्री घ्या.... आहे कुठे ही शाळा?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 22, 2022 | 8:54 AM
Share

पाटणाः बिहारच्या (Bihar) एका शाळेची सध्या जोरदार चर्चा आहे. ही शाळा  (School)आहे तिथल्या गया जिल्ह्यातली. शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे फीस म्हणून फक्त प्लास्टिकचा कचरा घेतला जातो. बोध गया येथील सेवा बिघा परिसरात ही शाळा आहे. मुलांना एक दंडक आहे. दररोज आपल्या घरातील प्लास्टिकचा कचरा (Plastic waste) शाळेत आणायचा…

मुलंदेखील शाळेची शिस्त पाळतात. घरून आणलेल्या कचरा शाळेच्या गेटजवळ ठेवलेल्या कचरा पेटीत टाकतात. यामुळे संपूर्ण बोध गया हा परिसर पूर्णपणे स्वच्छ राहिलाय.

या शाळेचं नाव आहे पद्मपाणी स्कूल. कचरापेटीत साठलेलं प्लास्टिक विकूनच शाळेचा सगळा खर्च भागवला जातो. मुलांना सांगण्यात आलंय… घरातून कचरा नसेल तर रस्त्यातून येताना कुठेही प्लास्टिकचा कचरा दिसला की तो आणायचा..

शाळेत जमा झालेला हा कचरा रिसायकल होण्यासाठी पाठवला जातो. आलेले पैशांमधून मुलांचे शिक्षण, खाण्या-पिण्याचे पदार्थ, कपडे आणि शालेय साहित्य आणि पुस्तकांवर खर्च केला जातो.

जागतिक ख्यातीचं गाव असल्याने बोधगया इथं देशविदेशातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे गाव स्वच्छ-सुंदर ठेवण्याकरिता शाळेनं हा उपक्रम सुरु केलाय. प्लास्टिक तर पर्यावरणासाठी धोकादायक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वातावरण बदल झालेला दिसून येतोय. त्यामुळेच स्थानिक पातळीवर का होईना शाळेनं मोठं परिवर्तन घडवायला सुरुवात केली आहे.

बिहारमधील या शाळेनं पर्यावरण रक्षणाचा एक आदर्श घालून दिलाय. विशेष म्हणजे शाळेला वीजपुरवठा होत नाही. सौरऊर्जेवर सगळी यंत्रणा चालते. पर्यावरण संरक्षणाच्या दिशेनं हे आणखी एक पाऊल आहे.

पद्मपाणी ही शाळा 2014 मध्ये सुरु झाली. सध्या शाळेत पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. बिहार सरकारची या शाळेला मान्यता आहे. शाळेत गरीब कुटुंबातील जवळपास 250 मुलं शिकायला येतात. त्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचा शाळेचा प्रयत्न आहे.

बिहार सरकारद्वारे शाळेला मान्यता आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके आणि स्टेशनरी फ्री दिली जाते.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत