AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC board 12th exam : बारावीच्या परीक्षेत महत्वाचे बदल, दीड तासांचा पेपर, मोजक्याच विषयांची परीक्षा?

आता तीन तासांच्या परीक्षेऐवजी फक्त 90 मिनिटांच्या कालावधीत परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. | CBSE 12th Board Exams

HSC board 12th exam : बारावीच्या परीक्षेत महत्वाचे बदल, दीड तासांचा पेपर, मोजक्याच विषयांची परीक्षा?
Student
| Updated on: May 24, 2021 | 7:44 AM
Share

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील बहुतांश राज्यांमधील दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय माध्यम शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे (HSC exam) स्वरुप बदलण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता तीन तासांच्या परीक्षेऐवजी फक्त 90 मिनिटांच्या कालावधीत परीक्षा घेतली जाईल. तसेच केवळ मुख्य विषयांसाठी लेखी परीक्षा होईल. तर उर्वरित विषयांसाठी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले जाईल, अशी शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (HSC 12th board exam structure may change due to Coronavirus)

दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात रविवारी दिल्लीत केंद्रातील मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत परीक्षा कशाप्रकारे घ्यायच्या यावर बराच खल झाला. यावेळी उपस्थितांनी आपापली मते आणि सूचना मांडल्या.

तीन तासांपेक्षा कमी कालावधीची परीक्षा?

कोरोनाचा धोका असला तरी केंद्र सरकार बारावीची परीक्षा रद्द करण्यास तयार नाही. काही राज्यांनीही परीक्षा लवकरात लवकर घेण्याचा आग्रह धरला आहे. आतापर्यंत बारावीच्या परीक्षेचा प्रत्येक पेपर तीन तासांचा असे. हा कालावधी आता 90 मिनिटांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. तसेच परीक्षेसाठी काही विषयही वगळले जाऊ शकतात. बारावी इयत्तेच्या एकूण विषयांपैकी केवळ 19 ते 20 मुख्य विषयांची परीक्षा होईल. तर इतर विषयांसाठी शाळांकडून अंतर्गत मूल्यमापन केले जाण्याची शक्यता आहे.

दोन टप्प्यांत परीक्षा

कोरोनाच्या धोक्यामुळे बारावीची परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जावी, अशीही एक सूचना बैठकीत करण्यात आली. तसेच निवडक केंद्रांवरच परीक्षा घेतली जावी. त्यानंतर दोन-तीन महिन्यांत परीक्षेचा निकाल जाहीर करावा, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला.

विद्यार्थ्यांना कोरोनाची लस द्या

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी या बैठकीत एक वेगळे मत मांडले. त्यांनी सांगितले की, बोर्डाच्या परीक्षेपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लस द्यावी. जेणेकरुन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची धोका कमी असेल.

संबंधित बातम्या:

CBSE 12th Board Exam 2021: बारावी परीक्षांच्या निर्णयापर्यंत पोहोचलोय, केंद्रीय शिक्षणमंत्री उच्चस्तरीय बैठकीवर काय म्हणाले?

दहावीच्या परीक्षा रद्दचं , बारावीच्या परीक्षेचं चित्र कधी स्पष्ट होणार, वर्षा गायकवाड यांनी काय सांगितलं?

ePathshala: पहिली ते बारावीपर्यंतची NCERT ची सर्व पुस्तके ई-बुक स्वरुपात, शिक्षण मंत्रालयाकडून ई-पाठशाला ॲप लाँच

(HSC 12th board exam structure may change due to Coronavirus)

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....