AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indira Gandhi Birth anniversary: ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण इंदिरा गांधी राजकारणात आल्या, बँकांच्या राष्ट्रियीकरणानं पालटलं देशाचं चित्र

भारताची चांद्र मोहीम, अणुबॉम्ब चाचणी, ऑपरेशनल ब्लू स्टार, बँकांचं राष्ट्रीयीकरण आणि आणीबाणी या आणि इतर महत्त्वाच्या कामांमुळं देशातल्या जनतेमध्ये इंदिरा गांधी यांच्याविषयी चर्चा सुरु असते.

Indira Gandhi Birth anniversary: ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण इंदिरा गांधी राजकारणात आल्या, बँकांच्या राष्ट्रियीकरणानं पालटलं देशाचं चित्र
इंदिरा गांधी
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Nov 25, 2021 | 8:08 PM
Share

नवी दिल्ली: भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ महत्वपूर्ण मानला जातो. भारतीय राजकारणातील महिला नेतृत्वाच्या यादीत इंदिरा गांधींचे नाव अग्रस्थानी येते. भारताची चांद्र मोहीम, अणुबॉम्ब चाचणी, ऑपरेशनल ब्लू स्टार, बँकांचं राष्ट्रीयीकरण आणि आणीबाणी या आणि इतर महत्त्वाच्या कामांमुळं देशातल्या जनतेमध्ये इंदिरा गांधी यांच्याविषयी चर्चा सुरु असते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या त्या कन्या होत्या. इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. 19 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांची 104 वी जयंती साजरी होत आहे.

शिक्षण सोडून राजकारणात प्रवेश

इंदिरा गांधींना राजकारणाचा वारसा लाभला होता. पंडित जवाहरलाल नेहरु यांचं नाव त्यांना मोठं करायचं होतं. इंदिरा गांधी यांनी वयाच्या 21 व्या वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ सोडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेस अध्यक्ष ते पंतप्रधान असा प्रवास

देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रदीर्घ काळ काँग्रेस पक्ष सत्तेत होता काळ होता. इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर त्या पूर्णपणे सक्रिय झाल्या. 1959 मध्ये त्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आल्या. 1966 मध्ये त्या पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या आणि सलग तीन वेळा त्या पदावर राहिल्या.

बँकांचं राष्ट्रियीकरण

भारत स्वतंत्र झाल्यानंतर केंद्र सरकारनं खासगी बँकांना कृषी आणि पायाभूत क्षेत्राला वित्त पुरवठा करण्याचं आवाहन केलं होतं. स्वातंत्र्यानंतर जवळपास 22 वर्ष खासगी बँका कृषी क्षेत्राला मुबलक प्रमाणात कर्ज पुरवठा करत नव्हत्या. खासगी बँका देशाच्या प्रगतीत सहकार्य करत नाहीत ही भावना वाढीस लागली होती. 19 जुलै 1969 रोजी सांयकाळी 8.30 वाजता देशाला संबोधित करुन 14 खासगी बँकांचं राष्ट्रियीकरण केल्याचं जाहीर केलं. राष्ट्रीयीकरणाचा वाद सुप्रीम कोर्टात गेला, कोर्टानं निर्णयाला स्थगिती दिली, इंदिरा गांधी यांनी अध्यादेश जारी करुन कोर्टाचा निर्णय बदलला होता. 1980 मध्ये त्यांनी आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं.

1972 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात इंदिरा गांधी यांनी कणखर भूमिका घेत पाकिस्तानचा पराभव करत बांग्लादेशच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. 1975 मध्ये लागू केलेल्या आणीबाणीवरुन इंदिरा गांधी यांच्यावर टीका करण्यात येते. इंदिरा गांधी यांच्यावर 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या अंगरक्षकांनी गोळीबार केला. यामध्ये त्यांचं निधन झालं.

इतर बातम्या:

निलंबनाच्या भीतीनं ST कर्मचाऱ्याकडून विष प्राशन, बुलडाण्याच्या विशाल अंबलकर यांचं अकोल्यात निधन

Nashik| ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपकडून महापालिकेत 2632 पदांची नोकर भरती

झूठ बोले कौआ काटे, भाजपच्या काळात दंगली झाल्याच नाहीत, अनिल बोंडे खोटं बोलत असल्याचा मलिक यांचा आरोप

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?