AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज 14 सप्टेंबर, हिंदी दिवस! का आणि कुणामुळे साजरा केला जातो हिंदी दिवस? जाणून घेऊया…

असं काय कारण आहे की आजच हा दिवस "हिंदी दिवस" म्हणून साजरा केला जातो? आपली अधिकृत आणि राजभाषा असलेल्या हिंदी बद्दल आपल्याला ही माहिती असायलाच हवी चला जाणून घेऊया...

आज 14 सप्टेंबर, हिंदी दिवस! का आणि कुणामुळे साजरा केला जातो हिंदी दिवस? जाणून घेऊया...
Hindi Diwas 2022Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 14, 2022 | 10:31 AM
Share

आपण भारतात कुठेही गेलो की आपण हिंदी भाषेला (Hindi Language) प्राधान्य देतो. आपल्याला माहित असतं समोरच्याची भाषा कुठलीही असो, त्याला हिंदी कळणारच. मग दोन वेगवेगळ्या भाषेचे लोक हिंदीवर येऊन एक होतात. आज 14 सप्टेंबर, हिंदी दिवस? हिंदी दिवस अत्यंत उत्साहात आणि आवर्जून साजरा केला जातो. ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. पण आजच हा हिंदी दिवस साजरा का केला जातो? 14 सप्टेंबर हीच तारीख का म्हणून निवडली गेली? असं काय कारण आहे की आजच हा दिवस “हिंदी दिवस” (Hindi Diwas) म्हणून साजरा केला जातो? आपली अधिकृत आणि राजभाषा (Rajyabhasha) असलेल्या हिंदी बद्दल आपल्याला ही माहिती असायलाच हवी चला जाणून घेऊया…

हिंदी विषयी बोलताना महात्मा गांधी एकदा म्हणाले होते, ‘हिन्दी भाषेशिवाय मी मुका आहे.’ बाळ गंगाधर टिळक यांनी सुद्धा हिंदी विषयी मत मांडताना म्हटलं होतं, “हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा बनू शकते अशी इच्छा आणि विचार ठेवणाऱ्या लोकांपैकी मी एक आहे.”

आजही हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती राजभाषा आहे. देशातील अनेक ठिकाणी ही भाषा बोलली जाते. या भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा आहे.

हिंदीसाठी 14 सप्टेंबर ही तारीख खूप खास आहे. याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहिलं कारण आहे, व्यौहार राजेन्द्र सिंह यांचं.त्यांच्या प्रयत्नांमुळेच हिंदीला भारतात राजभाषेचा दर्जा मिळाला.

हजारीप्रसाद द्विवेदी, काका कालेलकर, मैथिली शरण गुप्ता आणि सेठ गोविंद दास यांच्यासारख्या काही जणांसोबत व्यौहार राजेन्द्र सिंह हिंदीसाठी लढले,असं इतिहास सांगतो.

आज 14 सप्टेंबरला व्यौहार राजेन्द्र सिंह यांचा वाढदिवसही असतो. भारतीय राज्यघटना तयार होत असताना आपल्या संविधान सभेने 14सप्टेंबर 1949 रोजी हिंदी ही देशाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली.

हिंदी दिन पहिल्यांदा 69 वर्षांपूर्वी 1953 मध्ये साजरा करण्यात आला.

जेव्हा 2011 मध्ये जनगणना झाली तेव्हा असं आढळून आलं की, भारतात 43.63 टक्के लोक हिंदी भाषिक आहेत. भारतात हिंदी प्रामुख्याने उत्तर, पश्चिम राज्यांत बोलली जाते.

ज्या देशात 700 प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, जिथे राज्यघटनेतील अधिकृत भाषांच्या यादीत 22 भाषांचा समावेश झाला आहे, तिथे 43.63 टक्के लोकांनी हिंदी भाषेचा वापर करणे ही मोठी गोष्ट आहे. भारतीय संविधानाची पहिली अधिकृत भाषा हिंदी आणि दुसरी इंग्रजी आहे.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....