AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिमानास्पद! दीक्षा अ‌ॅपच्या वापरात महाराष्ट्र टॉपवर, शिक्षणमंत्र्यांचं खास ट्विट

दीक्षा अ‌ॅपच्या देशातील वापरापैकी सरासरी 46 टक्के वापर महाराष्ट्र राज्यात केला जातो. Varsha Gaikwad DIKSHA app

अभिमानास्पद! दीक्षा अ‌ॅपच्या वापरात महाराष्ट्र टॉपवर, शिक्षणमंत्र्यांचं खास ट्विट
वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
| Updated on: Mar 05, 2021 | 6:34 PM
Share

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. त्या अहवालाचा दाखला देत शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दीक्षा अ‌ॅपच्या वापरात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषदेने माहिती तंत्रज्ञानावर आधारित दीक्षा अ‌ॅपची निर्मिती केली होती. दीक्षा अ‌ॅपच्या देशातील वापरापैकी सरासरी 46 टक्के वापर महाराष्ट्र राज्यात केला जातो. वर्षा गायकवाड यांनी ट्विटवरुन त्याबाबत माहिती दिली आहे. (Varsha Gaikwad tweeted Maharashtra tops nation in use of DIKSHA app for school education )

2 लाख विद्यार्थ्यांकडून दीक्षा अ‌ॅपचा वापर

महाराष्ट्रातील दोन लाख विद्यार्थी दरदिवशी दीक्षा अ‌ॅपचा वापर करतात. दीक्षा अ‌ॅपच्या भारतात होणाऱ्या वापरापैकी एकूण 46 टक्के वापर महाराष्ट्र राज्यात होतो,अशी माहिती आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आली आहे.

वर्षा गायकवाड यांचे ट्विट

कोरोना काळात महाराष्ट्रानं केलेल्या उपाययोजना

महाराष्ट्र सरकारनं कोरोना काळात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले; जेणेकरून घरातूनच शिक्षण घेता येईल. इंटरनेट सुविधा नसलेल्या भागांत शैक्षणिक दिनदर्शिका सुविधा दिली. जिओ टीव्ही, दूरदर्शन व गुगल क्लासरूमसारख्या अद्ययावत सोयींमार्फत शिक्षण सुविधा पुरवण्यात आली.

जिओ टी.व्ही. च्या माध्यमातून 12 शैक्षणिक चॅनेलद्वारे तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहेत. दुरदर्शन वरील गली गली सिम सिम, टिली मिली, विविध ज्ञानगंगा, इत्यादी शैक्षणिक कार्यकमांद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आलं आहे.

आरटीई अंतर्गत 86 हजार विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश

प्रत्येक मुलास शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे. आर्थिक पाहणी अहवाल 2020-21 नुसार, आर्थिकदृष्ट्या मागास व वंचित घटकातील 86932 विद्यार्थ्यांना आरटीई म्हणजे शिक्षणाच्या अधिकारा अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाला. तसेच 2019 ते 2021 दरम्यान 60341 विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले गेले.

संबंधित बातम्या

आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?

IAF Pilot Recruitment: हवाई दलात पायलट बनायचे आहे, जाणून घ्या पदवीधर आणि 12 वी पास उमेदवारांना कसा मिळेल प्रवेश?

धनंजय मुंडेंच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली, पंकजा मुंडे यांचा बोचरा वार

(Varsha Gaikwad tweeted Maharashtra tops nation in use of DIKSHA app for school education )

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.