AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exit Poll Result 2022 Date : पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल 7 मार्चला, अपडेटस् कुठं पाहणार?

Exit Poll Result 2022 Date and Time: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यातील निवडणुकांचे एक्झिट पोल 7 मार्चला (Exit Poll date) उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जारी होतील.

Exit Poll Result 2022 Date : पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल 7 मार्चला, अपडेटस् कुठं पाहणार?
पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल 7 मार्चलाImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 05, 2022 | 5:10 PM
Share

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Assembly Election 2022) रणधुमाळी सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलीय. उत्तर प्रदेश वगळता पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांतील मतदान पार पडलं आहे. उत्तर प्रदेशमधील सातव्या टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडणार आहे. उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर टीव्ही 9 नेटवर्ककडून पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी कौल कुणाला दिलाय या संदर्भातील एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात येणार आहे. तुम्ही टीव्ही 9 मराठी वर एक्झिट पोल पाहू शकता. टीव्ही 9 मराठीची वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्झिट पोलचे अपडेट पाहता येतील. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यातील निवडणुकांचे एक्झिट पोल 7 मार्चला (Exit Poll date) उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जारी होतील.

एक्झिट पोलचे अपडेट कुठं पाहणार?

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील मतदार काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पार्टी या पैकी कोणत्या पक्षाला कौल देणार याचा कल एक्झिट पोलमधून पाहायला मिळेल. पाच राज्यातील सत्ता कोणत्या पक्षांकडे जाणार याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येणार आहे. एक्झिट पोलचे सर्व अपडेट टीव्ही 9 मराठी आणि www.tv9marathi.com वेबसाईटवर पाहायला मिळतील. टीव्ही 9 मराठीच्या सोशल मीडिया प्लॅट फॉर्मवर देखील अपडेट पाहायला मिळतील.

मतदान कसं पार पडलं?

गोवा आणि उत्तराखंड राज्यातील मतदान 14 फेब्रुवारी रोजी एका टप्प्यात पार पडलं. पंजाब राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. मणिपूर राज्यात 27 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मतदान पार पडत आहे.

उत्‍तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यात मतदान

पाच राज्यांपैकी सर्वात मोठे राज्य म्हणून उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 7 टप्पे करण्यात आले होते. 10 फेब्रुवारी , 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी , 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च रोजी मतदान पार पडलं आहे. आता 07 मार्चला सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

10 मार्चला निकाल

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, गोवा या राज्यांच्या निवडणुकांचे निकाल 10 मार्चला जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी 7 मार्चला सायंकाळी एक्झिट पोल पाहता येणार आहे.उत्तर प्रदेशमध्ये 406, पंजाब 117, गोवा 40, उत्तराखंडमध्ये 70, मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत.

इतर बातम्या:

Manipur Election : मणिपूरमध्ये 22 जागांसाठी मतदान सुरू, दुसऱ्या टप्प्यासाठी 1247 मतदान केंद्र सज्ज

Manipur Election : मणिपूरमध्ये मतदाना दिवशी गोळीबार, एका तरूणाचा मृत्यू; पोलिसांनी गोळी चालवल्याचा भाजपाचा आरोप

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.