AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी वयाच्या पंच्चाहत्तरीनंतर पंतप्रधान राहणार नाही, कुणी केला हा सर्वात मोठा दावा?

लोकसभा निवडणुकीचा निकाला जाहीर झाला आहे. भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. एनडीएला २९२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सरकार स्थापन झाले तरी ते जास्त काळ टिकणार नाही असं मत अनिल थत्ते यांनी मांडले आहे.

मोदी वयाच्या पंच्चाहत्तरीनंतर पंतप्रधान राहणार नाही, कुणी केला हा सर्वात मोठा दावा?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 05, 2024 | 10:49 PM
Share

लोकसभा निवडणुकीचा निकाला लागला असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. असं असलं तरी भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही. बहुमतापासून दूर असल्याने भाजपला इतर मित्रपक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागणार आहे. पंतप्रधान मोदी लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार असून येत्या ८ जून रोजी शपथविधी पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदाची निवडणूक ही फारच वेगळी ठरली. एक्झिट पोलचे आकडे देखील चुकीचे ठरले आहेत.

अनिल थत्ते यांनी देखील निवडणुकीच्या या चित्रावर आपलं मत सांगितलं आहे. ते म्हणाले की, ‘रामलल्लाचे बोट धरून जाणारे अवतारी पुरुष मोदी नाहीत. रामाने अनेकांचे बोट धरून घेऊन गेले. मात्र तुम्ही रामाचे बोट कसे धरून जाताय हे अंगलट आलं. त्यामुळे त्यांचा हा पराभव झाला. रामापेक्षा तुम्ही स्वतःला प्रेझेंट करायला गेले. राम दाखवले मात्र तुम्ही स्वतःचे दर्शन घडवलं हे लोकांना आवडले नाही.’

‘संविधान मधील काही कलमे त्यांना बदलायचे होते. त्यामुळे दलित आणि मुस्लीम हा फॅक्टर परिणामकारक झाला. अजित पवार हे शिंदे आणि फडणवीस यांच चॉईस नव्हतं. अजितदादा हे लादलेल ओझं होतं. राज ठाकरे यांच्यामुळे काय प्लस झालं मायनस झालं. अजित पवार यांना स्वतःच्या पत्नीला निवडून आणता आले नाही. अजितदादांच्या सीट ह्या भाजपकडे पाहिजे होत्या. अजित दादांचा पक्ष मोठ्या प्रमाणात फुटणार. मला जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं होतं अजित पवार यांचे निम्मे लोक आमच्या संपर्कात आहे ते कधीही फुटतील. हे माझ्या मनाच नाही.’

‘फडणवीसांच्या विरोधातली लॉबी स्ट्रॉंग आहे. त्यांना वाटतं फडणवीस जावे. फडणवीस सर्वांना डोही जड झाले आहे. ते एकटे स्वतःला मिनी मोदी समजत आहेत. फडणवीस स्टंट करणारे आहेत.’

‘सुप्रिया सुळे विजयी झाल्यात. कारण तेथे भाजपने सुनेत्रा पवार यांचं काम केले नसेल. भाजपने विरोधात काम केले आहे. नितीश कुमार पलटूराम आहेत. पहिले ते पलटी मारून जातील. 2014 साली nda मध्ये असताना upa मध्ये प्रस्ताव मांडला होता हे दोघेही बिन भरवसे आहे. हे सरकार पडेल असे वाटतेय.’ असं ही ते म्हणालेत.

‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत’

‘मोदी 75 नंतर पंतप्रधान राहणार नाही. मोदी सीट आणतील आता तो विश्वास राहिलेला नाही. महाघाडीचे सरकार आले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील. फडणवीस यांना चिंतन नाही तर चिंता करण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपने मदत केली नाही. आत्मपरीक्षण भाजपने कधीच केलं नाही. फडणवीस यांच्या विरोधात अनेक लोक आहेत.’

‘नरेश मस्के जिंकले नाही तर एकनाथ शिंदे जिंकले आहेत. नरेश मस्के यांना या लोकसभेत काहीच महत्त्व नाही. एकनाथ मॅजिक चालल म्हणून नरेश मस्के निवडून आले. नारायण राणे यांची पुण्याई स्वतःला तारून गेली म्हणून ते जिंकले.’

‘मी अमोल कीर्तीकर यांनाच विजय मानतो. कारण अमोल कीर्तीकर फक्त खिचडी मध्ये होते. वायकर मात्र अनेक ठिकाणी भ्रष्टाचारी होते. अनेक फायदे त्यांनी ठाकरेंकडून करून घेतले आहेत.’ असं ही अनिल थत्ते यांनी म्हटले आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा