भाजपच्या या बंडखोर आमदारांचा समाजवादी पार्टीत प्रवेश

योगी मंत्रिमंडळातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत धर्म सिंह सैनी यांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थित झाला.

भाजपच्या या बंडखोर आमदारांचा समाजवादी पार्टीत प्रवेश
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 3:46 PM

उत्तर प्रदेश – निवडणुक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यापासून राजकारण युपीमध्ये अधिक तापल्याचं पाहायला मिळत आहे. छोटे पक्ष घेऊन अखिलेश यादव (akhilesh yadav) हे आपली मोट घट्ट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर काँग्रेसच्या प्रियांका गांधी (priyanka gandhi) ताकद पणाला लावून भाजपला शह देण्याचा प्रयत्न करीत आहे. अशातच सध्या सत्तेत असलेल्या भाजपची मात्र डोकेदुखी वाढल्याचे चित्र कायम आहे. कारण आत्तापर्यंत त्यांच्या 9 आमदारांना बंड करून भाजपवरती गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे आज योगी मंत्रिमंडळातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (swami prasad mourya) यांनी अखेर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला आहे.

युपीत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून भाजपला सगळ्या पक्षांनी धक्कातंत्र द्यायला सुरूवात केली आहे. संपुर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या युपीच्या निवडणुकीत राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात घडत आहेत. योगीच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी राजीनामा सत्र सुरू ठेवल्याने भाजपसाठी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न सुध्दा केले जात आहेत.

योगी मंत्रिमंडळातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत धर्म सिंह सैनी यांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थित झाला. यावेळी बृजेश प्रजापती, भगवती प्रसाद सागर, मुकेश वर्मा, रोशन लाल वर्मा, विनय शाक्य, अपना दल चे चौधरी अमर सिंह, युसुफ अली, नीरज मौर्य, हरपाल सैनी शामिल या कार्यकर्त्यांनी सुध्दा पक्षप्रवेश केला आहे.

भाजप सरकारमधून राजीनामा देऊन बाहेर पडलेले दारा सिंह चौहान यांनी आत्तापर्यंत कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. तसेच ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबतही साशंकता आहे. तसेच दारा सिंह चौहान हे 16 जानेवारीला आपल्या कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करीत पक्षप्रवेश करणार असल्याची सुध्दा चर्चा आहे. पक्षप्रवेशाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी अखिलेश यादव यांना पगडी घालून सत्कार केला. त्यानंतर धर्म सिंह सैनी बोलत असताना असे म्हणाले की, जर कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात नसता, तर आज इथे 10 लाख लोकांच्या उपस्थित पक्षप्रवेश झाला असता. तसेच 2022 ला अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री आणि 2024 ला त्यांना पंतप्रधान करणार असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, भाजपच्या काही नेत्यांना आमदार खासदार यांच्याशी बोलायला वेळ नव्हता. आज त्यांची झोप उडाली आहे, तसेच आजचा दिवस हा भाजपच्या अंताचा इतिहास लिहिणार आहे.

UP Assembly Election: काँग्रेसने राजकीय मैदानात उतरवली बिकनी गर्ल, बॉलिवूडमध्ये केलंय काम

भाजपचे 9 बंडखोर आमदार आज समाजवादी पक्षात सामील होण्याची शक्यता

UP Assembly Election: उत्तर प्रदेशात शिवसेना इतक्या जागा लढणार ? संजय राऊतांनी केलं स्पष्ट

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.