AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ऐश्वर्यामुळे आराध्या हिची वागणूक…’, अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य

Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा, आराध्या हिच्या वागणुकीबद्दल अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण... गेल्या काही दिवसांपासून सतत बच्चन कुटुंब आहे चर्चेत...

'ऐश्वर्यामुळे आराध्या हिची वागणूक...', अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य
| Updated on: Dec 27, 2023 | 10:49 AM
Share

मुंबई | 27 डिसेंबर 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. पण लेक आराध्या हिच्यामुळे दोघे विभक्त होण्याचा निर्णय घेत नसल्याची चर्चा देखील समोर येत आहे. आराध्या कायम आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत दिसते. नुकताच शाळेच्या एनुअल डे कार्यक्रमात आराध्या हिला आई – वडिलांसोबत स्पॉट करण्यात आलं. सोशल मीडियावर आराध्या हिचे अनेक व्हिडीओ देखली व्हायरल झाले. अनेक ठिकाणी आराध्या हिला स्पॉट करण्यात येतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आराध्या हिच्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात.

दरम्यान, अभिषेक याला आराध्या हिच्याबद्दल विचारण्यात आलं होत. तेव्हा अभिषेक म्हणाला होता, ‘मी आराध्या हिच्यासाठी प्रचंड सक्त वडील नाही. मी तिचे जास्त लाड देखील करत नाही. मला असं वाटतं मुलांवर प्रेम करायला हवं. रोज त्यांना प्रोत्साहित करायला हवं. भावनीक रित्या त्यांचं समर्थन करायला हवं… आजची मुलं प्रचंड हुशार आहेत…’

ऐश्वर्या आणि आराध्या यांच्याबद्दल अभिषेक म्हणाला…

मुलाखतीत अभिषेक याला विचारण्यात आलं की, आराध्या हिच्या चांगल्या संगोपनाचं श्रेय कोणाला देशील? ज्यावर अभिषेक याने पत्नी ऐश्वर्या हिचं कौतुक केलं आणि मुलीची चांगली काळजी घेतल्याचं श्रेयही ऐश्वर्या हिला दिले. यावर अभिषेक बच्चन म्हणाला, “माझ्या मुलीची काळजी घेण्याचे श्रेय मी ऐश्वर्याला देऊ इच्छितो. मी जेव्हाही चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी जातो तेव्हा ती आमच्या मुलीची पूर्ण काळजी घेते.’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘ऐश्वर्या हिच्यामुळे आराध्या हिची वागणूक उत्तम आहे. ऐश्वर्या आणि मी आराध्या हिला फक्त एक चांगली व्यक्ती कशी घडवता यईल यासाठी प्रयत्न करत असतो.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

सांगायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आले आहे. ऐश्वर्या राय हिने सासर सोडल्याची देखील चर्चा आहे. ऐश्वर्या आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्यामध्ये मतभेद आहेत. शिवाय अभिषेक मुलगा आणि पती दोघांची जबाबदारी घेण्यास असमर्थ असल्याची देखील चर्चा रंगली..

पण यावर बच्चन कुटुंब किंवा ऐश्वर्या – अभिषेक यांनी मौन बाळगलं आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल होत असतात.. पण सत्य नक्की काय आहे? हे अद्याप समोर आलेलं नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.