अंडरवर्ल्डच्या दहशतीत एका रात्रीत उद्ध्वस्त झाली अभिनेत्री, अनेक वर्षांनंतर अखेर सोडलं मौन

दिग्गज अभिनेत्यांसोबत झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री अंडरवर्ल्डच्या दहशतीत एका रात्रीत झाली उद्ध्वस्त, अखेर पश्चाताप व्यक्त करत सोडलं मौन..., 90 च्या दशकात अभिनेत्रीने अनेकांच्या मनावर केलेलं राज्य...

अंडरवर्ल्डच्या दहशतीत एका रात्रीत उद्ध्वस्त झाली अभिनेत्री, अनेक वर्षांनंतर अखेर सोडलं मौन
90s Actress
| Updated on: May 22, 2026 | 12:29 PM

90s Actress: 90 च्या दशकात बॉलिवूड अंडरवर्ल्डच्या दहशतीखाली होता. बॉलिवूडमध्ये होणार मोठे निर्णय अंडरवर्ल्डच्या दहशतीखाली घेतले जायचे. एवढंच नाही तर, यामुळे अनेक अभिनेत्रींचं आयुष्य देखील उद्ध्वस्त झालं. आता देखील अशात एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. जिने अंडरवर्ल्डच्या भीतीने बॉलिवूडला राम राम ठोकला. नाहीतर ती अभिनेत्री आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी असती. एककाळ असा होता जेव्हा अभिनेत्रीने फक्त चाहत्यांच्या मनावरच नाही तर, बॉक्स ऑफिंसवर देखील राज्य केलं. अभिनेत्रीने सुनील शेट्टी, गोविंदा यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री साक्षी शिवानंद आहे. साक्षी हिने बॉलिवूडसोबतच तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम सिनेमात देखील काम केलं. साक्षी हिचे ‘आपको पहले भी कहीं देखा है’ (2003) आणि ‘क्रोध’ (2000) यांसारखे सिनेमे आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत.

साक्षी हिने करियरची सुरुवात 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अन्ना वदिना’ या तेलुगू सिनेमातून केली. त्यानंतर साक्षीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. हळू – हळू साक्षी हिच्या लोकप्रियतेत वाढ होत होती. याच दरम्यान, अभिनेत्रीला अंडरवर्ल्डकडून फोन येऊ लागले. त्यानंतर अभिनेत्रीला कळंल की, ज्या सिनेमात ती काम करत आहे, त्या सिनेमाचा निर्माता अंडरवर्ल्डशी जोडलेला आहे…

सिनेमाचं नाव होतं ‘तुम’ आणि सिनेमा अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत होता. यावर 2013 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत साक्षी म्हणालेली, ‘जेव्हा मला कळलं की सिनेमाचा निर्मात अंडरवर्ल्डमधील आहे, तेव्हा मी प्रचंड घाबरली. बॉलिवूड सोडून मी तेलुगू, कन्नड सिनेमांमध्ये काम करु लागली…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी सर्वांशी संपर्क तोडले. तेव्हा मला कळलं की, बॉलिवूडमधील माझं करियर उद्ध्वस्त झालं आहे. पण तेव्हा मी घाबरली नसती तर, आजही मी बॉलिवूडमध्ये सक्रिय असती. पण मी बॉलिवूडसोडून पळून गेली. ‘तूम’ सिनेमाचा निर्माता मला सतत फोन करायचा… म्हणून मला नंबर बदलावा लागला… कोणाला माहिती नव्हतं की, मी कुठे आहे… याची मला मोठी किंमत मोजावी लागली. माझं करियर मला गमवावं लागलं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

Follow Us