AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी, अल्लू अर्जुनने बायको मुलांसह घर सोडलं; हल्ल्याचा भयंकर धसका, साऊथमध्ये चाललंय काय?

पुष्पा 2 च्या प्रीमियरनंतर झालेल्या दुर्घटनेचे पडसाद भयंकर उमटले आहेत. परिणामी त्याच्या घरावर हल्ला झाला. या घटनेचा अल्लू अर्जुनने एवढा धसका घेतला की तो आपल्या कुटुंबासह आपल्या घरातून निघून गेला आहे.

मोठी बातमी, अल्लू अर्जुनने बायको मुलांसह घर सोडलं; हल्ल्याचा भयंकर धसका, साऊथमध्ये चाललंय काय?
| Updated on: Dec 23, 2024 | 6:07 PM
Share

अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या पुष्पा 2 मुळे चर्चेत आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे ते 4 डिसेंबर रोजी त्याच्या चित्रपटाच्या प्रीमिअर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे. या घटनेमध्ये एका महिलेचा जागीचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा जखमी झाला होता. हे प्रकरण इतकं तापलं की त्यादरम्यान अल्लू अर्जुनला अटकही करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत.

प्रीमिअर दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद

दरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला एक कोटी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या संतप्त वातावरणाचे पडसाद अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला होण्यापर्यंत झाले.

या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या काही लोकांनी आता अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला केला. रविवारी (22 डिसेंबर रोजी) उस्मानिया विद्यापीठातील काही जणांनी अल्लूच्या, हैदराबादमधील जुबली हिल्स परिसरात असलेल्या घरावर हल्ला करून तोडफोड केली.

हल्ल्यानंतर अल्लू अर्जुनने कुटुंबासह घर सोडलं

ही घटना घडली तेव्हा अल्लू अर्जुन त्याच्या घरी उपस्थित नव्हता. पण या घटनेमुळे सर्वांनाच नक्की धक्का बसला. तसेच अल्लू अर्जुनच्या कुटुंबावर पुन्हा असा हल्ला कधाही होऊ होऊ शकतो हे नाकारतही येणार नाही.

या सर्व घटनांचा विचार करता आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अल्लू आपली पत्नी आणि मुलांसह घर सोडून निघून गेला. या घटनेनंतर त्याच्यासाठी सध्यातरी त्याच्या कुटुबांची सुरक्षा जास्त महत्त्वाची असल्याचं त्याच्या या कृतीवरून नक्कीच लक्षात येत.

अल्लू अर्जुनचे वडील अरविंद यांची प्रतिक्रिया

तसेच या घटनेनंतर अल्लू अर्जुनचे वडील अरविंद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना अल्लू अर्जुनचे वडील अरविंद म्हणाले, “आज आमच्या घरी जे घडलं ते सर्वांनी पाहिलं आहे. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची ही योग्य वेळ नाही. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माझ्या घराजवळ कोणीही गोंधळ घालू नये, यासाठी पोलीस तैनात आहेत. अशा घटनांना कोणीही प्रोत्साहन देऊ नये. ही संयम ठेवण्याची वेळ आहे. कायदा हे प्रकरण मार्गी लावेल.” असं म्हणत त्यांनी या घटनेचा निषेध केला.

दरम्यान हे प्रकरण काही तोडगा निघून शांत होईल की पुढे अजून याचे पडसाद बघायला मिळतील हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.