AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ए. आर. रेहमान यांच्या पत्नीला मिळणार भरभक्कम पोटगी? काय म्हणाली वकील?

‘लग्नाची तीस वर्षे गाठण्याची आमची आशा होती पण सर्व गोष्टींचा अनपेक्षित शेवट पहायला मिळतोय. आमच्या हृदयाच्या झालेल्या तुकड्यांच्या भाराने आज देवाचंही सिंहासन थरथर कापू शकतं’, अशी पोस्ट रेहमान यांनी लिहिली होती.

ए. आर. रेहमान यांच्या पत्नीला मिळणार भरभक्कम पोटगी? काय म्हणाली वकील?
A R Rahman and Saira BanuImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 30, 2024 | 1:00 PM
Share

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर पत्नी सायरा बानूसोबत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. सायरा यांनीसुद्धा वकील वंदना शाहच्या माध्यमातून सोशल मीडियावर पोस्ट लिहित विभक्त होणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर घटस्फोटाप्रकरणी पुढे काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आता वकील वंदना शाहने रेहमान आणि सायरा यांच्यात पुन्हा सलोखा होऊ शकतो का आणि त्यांच्या तीन मुलांचा ताबा कोणाला मिळू शकतो, याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

विकी ललवानीच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत वंदना शाह यांना रेहमान आणि सायरा यांच्या मुलांच्या कस्टडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “त्याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्याविषयी निर्णय घेणं बाकी आहे. पण काही मुलं प्रौढ असल्याने त्यांना कोणासोबत राहायचंय याचा निर्णय घेण्यासाठी ते मुक्त आहेत.” यावेळी वंदना यांना पोटगीबद्दलही सवाल करण्यात आला होता. रेहमान यांच्याकडून सायरा यांना मोठी पोटगी मिळेल का, असं त्यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर वकिलांनी उत्तर देणं टाळलं. त्याचप्रमाणे सायरा या पैशांचा विचार करणाऱ्या नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

या मुलाखतीत सायरा यांनी रेहमान आणि सायरा यांच्यात पुन्हा सलोखा होण्याची शक्यताही नाकारली नाही. “मी असं म्हटलं नाही की या दोघांमध्ये सलोखा होऊ शकत नाही. मी याबाबत खूप सकारात्मक आहे आणि मी नेहमीच प्रेम, रोमान्स याबद्दल बोलत असते. दोघांनी एकत्र दिलेलं स्टेटमेंट खूपच स्पष्ट आहे. त्यात विभक्त होण्याबद्दलचं दु:ख व्यक्त केलं गेलंय. रेहमान आणि सायरा हे अनेक वर्षं या नात्यात होते आणि या निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी त्यांनी बराच विचार केला. पण मी असं कुठेच म्हटलं नाही की हे दोघं पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत.”

रेहमान आणि सायरा यांनी 1995 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना खतिजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत. घटस्फोटाच्या निर्णयानंतर रेहमान यांच्यावर बरीच टीका झाली. या टीकेनंतर सायरा यांनी त्यांची बाजू घेत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. “ए. आर. रेहमान हे व्यक्ती म्हणून हिऱ्यासारखे आहेत. या जगातील ते सर्वोत्कृष्ट पुरुष आहेत. माझ्या आरोग्याच्या समस्यांमुळे मला चेन्नई सोडावं लागलं. चेन्नईत कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्याला हे शक्य झालं नसतं. मी युट्यूबर्स आणि तमिळ मीडियाला विनंती करते की त्यांनी त्यांच्याविरोधात काहीही वाईट बोलू नये. माझ्या आयुष्यात मी त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला. इतकं माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यावर चुकीचे आरोप करू नका”, असं सायरा यांनी म्हटलं होतं.

Follow Us
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला.
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?.
व्हीएसआरच्या मालकांचं मोठं विधान, चूक असेल तर शिक्षा करा!
व्हीएसआरच्या मालकांचं मोठं विधान, चूक असेल तर शिक्षा करा!.
इराण आणि इस्रायल युद्धावरून संसद तापली, लोकसभेत गदारोळ
इराण आणि इस्रायल युद्धावरून संसद तापली, लोकसभेत गदारोळ.
पुणे विमानतळावर 8 कोटींचे ड्रग्ज जप्त! एअर इंटेलिजन्सची मोठी कारवाई
पुणे विमानतळावर 8 कोटींचे ड्रग्ज जप्त! एअर इंटेलिजन्सची मोठी कारवाई.
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.