AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | घराला अद्याप ‘कर्णधारा’ची प्रतीक्षा, निक्की-जान-पवित्रा-एजाजमध्ये तूफान वादावादी!

जास्मीन भसीन, अली गोनी, कविता कौशिक आणि एजाज खान यांच्यादरम्यान हा ‘कर्णधार’पदाचा सामना रंगणार आहे. ‘बिग बॉस’ने राहुल वैद्यला या खेळाचा संचालक बनवले आहे.

Bigg Boss 14 | घराला अद्याप ‘कर्णधारा’ची प्रतीक्षा, निक्की-जान-पवित्रा-एजाजमध्ये तूफान वादावादी!
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 07, 2020 | 5:26 PM
Share

मुंबई :बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरातील नवी सकाळ जोरदार भांडणांनी सुरू झाली. सकाळी सकाळीच निक्की तंबोली आणि जान कुमार सानूमध्ये जोरदार वादावादी रंगली होती. वापरलेला टिश्यू पेपर कचऱ्याच्या डब्यात टाकण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. निक्की आणि जानच्या या वादामुळे चिडलेल्या ‘बिग बॉस’ने जुना ‘कॅप्टन’सी टास्क (Captaincy Task) रद्द करत, नव्या टास्कची घोषणा केली. त्यामुळे या आठवड्यात घराला अद्याप ‘कर्णधार’ मिळालेला नाही (Bigg Boss 14 Latest update New Captaincy Task).

या नव्या कॅप्टन्सी टास्कमध्ये घरातील जुन्या कर्णधारांनाच सहभागी होता येणार आहे. इतर स्पर्धकांना या खेळात सहभागी होता येणार नाही. जास्मीन भसीन, अली गोनी, कविता कौशिक आणि एजाज खान यांच्यादरम्यान हा ‘कर्णधार’पदाचा सामना रंगणार आहे. ‘बिग बॉस’ने राहुल वैद्यला या खेळाचा संचालक बनवले आहे.

‘कर्णधार’ पदाच्या खेळीला सुरुवात

या टास्कमध्ये चारही स्पर्धकांना चार वेगवेगळ्या बॉक्समध्ये बंद करण्यात आले आहे. या बॉक्सला काही छिद्र पाडण्यात आली आहेत. जो स्पर्धक या बॉक्समध्ये सर्वात जास्त काळ राहील, त्याच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडणार आहे. एजाजच्या खांद्याला दुखापत झाल्याने पवित्रा त्याला मदत करणार आहे (Bigg Boss 14 Latest update New Captaincy Task).

(Bigg Boss 14 Latest update New Captaincy Task)

घरातल्यांकडून खेळाला सुरुवात

या टास्कदरम्यान घरातील इतर स्पर्धकांनी बॉक्समध्ये बंद असणाऱ्या स्पर्धकांना त्रास देण्यास सुरुवात केली. फोबियामुळे अली गोनी या खेळातून स्वतः आऊट झाला. कविता कौशिकला त्रास देऊ पाहणाऱ्या जान कुमार सानूला निक्कीने रोखले. यावर जान कुमार सानू निक्कीला म्हणाला की, त्याला कविताला या घराची कर्णधार होवू द्यायचे नाही. जान कविताच्या बॉक्समध्ये तेल आणि स्प्रे टाकतो. तर, दुसरीकडे राहुल पवित्राच्या बॉक्समध्ये स्प्रेची फवारतो. यावरून राहुल आणि एजाजमध्ये वाद झाले.

एजाज आणि पवित्रामध्ये वाद

अली खेळातून बाद झाल्यानंतर एजाजने देखील स्वतःहून बॉक्स उडवला आणि पवित्राला खेळाबाहेर केले. पवित्रा बॉक्समधून बाहेर पडल्याने आता ती नॉमिनेट झाली आहे. यावर संतापलेल्या जान कुमार सानूने एजाज खानला बऱ्याच गोष्टी सुनावल्या. ज्या व्यक्तीने कायम तुला साथ दिली, त्याच व्यक्तीसोबत तू असे का करतोस, असा प्रश्न जानने एजाजला केला. जान दुःखी झाल्याने पवित्रा आणि एजाजने एकमेकांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळाने दोघांनी एकमेकांना दोष द्यायला सुरुवात केली. यानंतर पवित्रा-एजाजमध्ये जोरदार भांडण झाले. या सगळ्या वादात मात्र, अजूनही घराला कर्णधार मिळालेला नाही.

(Bigg Boss 14 Latest update New Captaincy Task)

Follow Us
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ.......
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील.
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल....
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल.....
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं.
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.