AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Thakare | “जेवढं प्रेम करायचं होतं ते..”; शिव ठाकरेनं रिलेशनशिप स्टेटसबद्दल केला खुलासा

शिव ठाकरेचं अभिनेत्री वीणा जगतापशी नाव जोडलं गेलं होतं. जेव्हा या दोघांचं ब्रेकअप झालं तेव्हा त्यांच्या चाहत्यांमध्येही सोशल मीडियावर खडाजंगी झाली होती. त्यामुळे भविष्यात रिलेशनशिपमध्ये असल्यावर ते माध्यमांपासून लपवणार का, असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला..

Shiv Thakare | जेवढं प्रेम करायचं होतं ते..; शिव ठाकरेनं रिलेशनशिप स्टेटसबद्दल केला खुलासा
Shiv ThakareImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 24, 2023 | 2:59 PM
Share

मुंबई : एकानंतर एक तीन शोजनंतर अभिनेता शिव ठाकरे पुन्हा एकदा नव्या रिॲलिटी शोसाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच ‘खतरों के खिलाडी’ या रिॲलिटी शोमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी त्याने दोन मराठी चित्रपटांचेही ऑफर्स नाकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिव ठाकरे त्याच्या करिअरविषयी आणि रिलेशनशिप स्टेटसविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

“मला चित्रपटांचे ऑफर्स मिळाले होते. पण मी ते नाकारले. मोठ्या दिग्दर्शकाकडून ही ऑफर आली होती. दोन्ही चित्रपटांचे शूटिंग एप्रिलमध्ये सुरू होणार होते आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत संपणार होते. पण मी खतरों के खिलाडी या शोची ऑफर स्वीकारल्याने माझ्या तारखा त्यावेळी उपलब्ध नव्हत्या. मला त्या शोविषयीची ओढ जास्त होती, म्हणून चित्रपटांना नाकारण्याचा निर्णय मी घेतला”, असं शिवने सांगितलं.

“कॅमेरासमोर मी जसा आहे तसाच वागतो, त्यामुळे प्रेक्षकांकडून मला खूप पाठिंबा मिळतो. सध्या मी माझ्या हिंदी भाषेवर अधिक मेहनत घेत आहे. अमरावतीच्या गल्ल्यांमधून इथपर्यंत पोहोचलोय तर याचा अर्थ असाच आहे की मी योग्य मार्गावर आहे. मला आणखी थोडी मेहनत करण्याची गरज आहे. आज नाही तर पाच वर्षांनी किंवा नंतर कधीतरी मी चित्रपटात काम नक्कीच करेन. माझ्यासाठी भाषा महत्त्वाची नाही. महाराष्ट्रीयन असल्याने मला मराठी चित्रपट करायला आवडेल. पण ते फक्त महाराष्ट्रापुरतंच मर्यादित असेल. हिंदी चित्रपटात काम केल्यावर मी संपूर्ण भारतात पोहोचेन. मी मराठी चित्रपट करेनच पण बॉलिवूड हे बॉलिवूडच आहे”, असंही त्याने स्पष्ट केलं.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

या मुलाखतीत शिव ठाकरे त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दलही व्यक्त झाला. “मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं आहे आणि तेच एकमेव प्रेम सध्या माझ्या आयुष्यात आहे. जेवढं प्रेम करायचं होतं, तेवढं कॉलेजच्या दिवसांमध्ये केलं. आता माझं करिअर उभं करण्याची वेळ आली आहे.”

शिव ठाकरेचं अभिनेत्री वीणा जगतापशी नाव जोडलं गेलं होतं. जेव्हा या दोघांचं ब्रेकअप झालं तेव्हा त्यांच्या चाहत्यांमध्येही सोशल मीडियावर खडाजंगी झाली होती. त्यामुळे भविष्यात रिलेशनशिपमध्ये असल्यावर ते माध्यमांपासून लपवणार का, असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “माझं आयुष्य हे खुल्या किताबाप्रमाणे आहे. प्रेम करेन तर खुल्लमखुल्ला करेन. लोक माझ्याबद्दल किंवा माझ्या प्रेमाबद्दल काय बोलतात, याने मला फरक पडत नाही. मी अशा गोष्टींना घाबरत नाही. ”

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.