Bigg Boss Marathi 6: एकाच वेळी 2 विजेतेपदाचे दावेदार घराबाहेर? भाऊच्या धक्क्यावर कोणाचा गेम होणार?

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी 6' शो आता रंगात आला आहे. स्पर्धकांच्या एक एक बाजू आता समोर येत आहे... त्यामुळे कोणाचा गेम सरस ठरणार आणि कोणाचा गेम होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... तर आज कोण बाद होणार याची देखील चर्चा सुरू आहे.

Bigg Boss Marathi 6:  एकाच वेळी 2 विजेतेपदाचे दावेदार घराबाहेर? भाऊच्या धक्क्यावर कोणाचा गेम होणार?
| Updated on: Feb 15, 2026 | 2:41 PM

Bigg Boss Marathi 6: अभिनेता आणि होस्ट रितेश देशमुख याचा वादग्रस्त ‘बिग बॉस मराठी 6’ शोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या फक्त आणि फक्त ‘बिग बॉस मराठी’ सीझन 6 ची चर्चा सुरुर आहे. बिग बॉस सुरु होऊन आता पाच आठवडे झाले असून शो एका रंजक वळणावर आला आहे. त्यामुळे स्पर्धकांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता देखील आता शिगेला पोहोचली आहे. आता या वादग्रस्त घरात कोण शेवटपर्यंत टिकणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राधा, सोनाली बेंद्रे, ओमकार राऊत यांच्यानंतर घराबाहेर कोणाला जावं लागणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर आज काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रंगत असलेल्या चर्चांनुसार, या आठवड्यातून एक नाही तर, दोन विजयी दावेदार घरातून बाहेर जाणार असं कळत आहे.

सोशल मीडियावर रंगत असलेल्या चर्चांनुसार, आठवड्यात ‘डबल एव्हिक्शन मिळणार आहे. त्यामुळे कोणाचा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रेक्षकांमध्ये होणाऱ्या चर्चांनुसार आणि स्पर्धकांचा खेळ पाहता करण सोनावणे आणि आयुष संजीव यांचा प्रवास संपणार अशी चर्चा सुरु आहे.

राकेश बापट,करण सोनावणे,प्रभू शेळके,प्राजक्ता शुक्रे,सचिन कुमावत,आयुष संजीव हे स्पर्धक या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. सहा जणांपैकी कोणाची एक्झिट होणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण दोन जणांना घरातून बाहेर जावं लागेल अशी चर्चा रंगल्यानंतर कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपेल… हे आत भाऊच्या धक्क्यावर कळणार आहे.

रिपोर्टनुसार, कंटेंट क्रिएटर करण सोनावणे याला घरातून बाहेर काढल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसेल… किंवा ‘बिग बॉस’ सिक्रेट रुममध्ये जाण्याचे देखील आदेश देतील.. नक्की काय होईल ते आज रात्री कळेल. करण याला महाराष्ट्र सेफ करेल का… पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तर आयुष याच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून तो घरात सक्रिय नसल्याचं दिसत आहे. प्रकृती कारणामुळे आयुष टास्कमध्ये देखील सहभागी झाला नव्हता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राखी हिने एन्ट्री घेतल्यानंतर आयुष पूर्णपणे बॅकफूटला गेला आहे… त्यामुळे आज कोणाचा प्रवास संपणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.