The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’च्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याने कॉलेज तरणींसाठी उचललं मोठं पाऊल

केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

The Kerala Story | 'द केरळ स्टोरी'च्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याने कॉलेज तरणींसाठी उचललं मोठं पाऊल
The kerala story
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 2:01 PM

लखनौ : सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. एकीकडे या चित्रपटाला काहींचा विरोध आहे तर दुसरीकडे काहींनी चित्रपटातील कथेला समर्थन दिलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रचारकी असल्याची टीका काहींनी केली आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता एका भाजप नेत्याने मोठं पाऊल उचललं आहे. लखनौमधील नवयुग कन्या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजच्या 100 विद्यार्थिनींसाठी भाजप नेते अभिजात मिश्रा यांनी ‘द केरळ स्टोरी’च्या स्क्रिनिंगचं आयोजन केलं आहे. लखनौमधील एका सिनेमा हॉलमध्ये 100 विद्यार्थिनींना हा चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी खुद्द उत्तरप्रदेशनचे भाजप सचित अभिजात मिश्रासुद्धा उपस्थित होते.

याविषयी अभिजात यांनी ट्विट करत लिहिलं, ‘लव्ह जिहादपासून मुलींचं आयुष्य सुरक्षित करण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा. दहशतवादी, लव्ह जिहादचं समर्थन करणाऱ्यांवर आणि द केरळ स्टोरीचा विरोध करणाऱ्या पक्षांवर बंदी आणली पाहिजे.’ अनेकदा राजकीय प्रचारांदरम्यान ‘लव्ह जिहाद’ हा शब्द वापरला जातो. लव्ह जिहाद ही एक अशी संकल्पना आहे ज्यामध्ये मुस्लिम पुरुष हिंदी स्त्रीला इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रलोभन दाखवतो. “मुस्लिम मुलांच्या जाळ्यात अडकण्यापासून तरुणींचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे”, असं मिश्रा पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

कॉलेज विद्यार्थिनींना चित्रपट दाखवण्याविषयी मिश्रा म्हणाले, “सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे लव्ह जिहाद हा प्रेमाचा अपमान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते आमच्या मुलांना राष्ट्रविरोधी बनवत आहेत. प्रत्येकजण आपापल्या धर्माचं पालन करण्यासाठी मोकळा आहे पण दुसऱ्यांचं शोषण करून त्यांना चुकीच्या मार्गावर ढकलणं चुकीचं आणि अस्वीकार्य आहे.” केरळमधील तीन महिन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मुस्लिम पुरुषांकडून हिंदू महिलांना कसं आमिष दाखवलं जातं, हेदेखील पाहिल्याचा दावा मिश्रा यांनी यावेळी केला.

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट दाखवण्याआधी विद्यार्थिनींची परवानगी घेण्यात आली होती, असं स्पष्टीकरण नवयुग कन्या पीजी. कॉलेजच्या मुख्याध्यापिका मंजुला उपाध्याय यांनी दिलं आहे. विद्यार्थिनींसोबत शाळेतले काही शिक्षकसुद्धा त्यावेळी उपस्थित होते, असंही त्यांनी म्हटलंय.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 8 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 12 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अवघ्या 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत चांगलीच वाढ झाल्याचं पहायला मिळालं. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.