Dhurandhar 2 सिनेमातील अनेक सीन्सवर फिरवली कात्री, संताप व्यक्त करत अभिनेता म्हणाला…

Dhurandhar 2 : 'धुरंधर 2' सिनेमातील अनेक सीन्सवर फिरवण्यात आलीये कात्री... सिनेमाबद्दल मोठं सत्य अखेर समोर... संताप व्यक्त करत अभिनेता म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'धुरंधर 2' सिनेमाची चर्चा...

Dhurandhar 2 सिनेमातील अनेक सीन्सवर फिरवली कात्री, संताप व्यक्त करत अभिनेता म्हणाला...
Dhurandhar 2
| Updated on: Apr 03, 2026 | 9:48 AM

Dhurandhar 2 Actor Disappointed: अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. सिनेमाने आतापर्यंत जगभरात तब्बल 1400 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा गल्ला जमा केला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त ‘धुरंधर 2’ सिनेमाची दहशत पाहायला मिळत असताना, इतर दिग्दर्शक त्यांचे सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यासाठी घाबरत आहे. कारण ‘धुरंधर 2’ सिनेमाच्या शर्यतीत कोणत्या दुसऱ्या सिनेमाचं टिकणं फार कठीण आहे… सांगायचं झालं तर, सिनेमातील सर्वच कलाकारांचं कौतुक होत आहे. पण एक अभिनेता मात्र नाराज आहे… अभिनेत्याचे अनेक सीन सिनेमातून डिलिट केले आहेत.

ज्या अभिनेत्याचे सिनेमातून सीन डिलिट केले आहेत, त्याने सिनेमात रणवीर सिंग याच्या टोळीतील शकील कमांडो याची भूमिका साकारली होती. अभिनेत्याचं नाव विक्रम भांबरी असं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने सिनेमाबद्दल मोठं वक्तव्य करत नाराजी व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.
विक्रम म्हणाला ‘जेव्हा मला माझ्या भूमिकेबद्दल सांगण्यात आलं… तेव्हा मला भूमिकेचं नाव थोडं दहशतवाद्याप्रमाणे वाटलं…

पण त्यानंतर मी स्वतःचीच समज घातली की, कमीत कमी माझ्याकडे नाव तरी आहे… मला दुसऱ्या कोणत्या व्यक्तीप्रमाणे वागणूक तरी नाही मिळणार… सिनेमात जर तुमच्या भूमिकेला नाव आहे. तर सिनेमात तुमची महत्त्वाची भूमिका असेल… पण नंतर काम करण्यात सुरुवात केली तेव्हा कळलं की, मी रणवीर सिंग याच्या टोळीतील एक सदस्य आहे. ज्यामुळे मला प्रचंड आनंद झालेला.’

सीन्सवर कात्री फिरवण्यात आल्यानंतर अभिनेता म्हणाला, ‘सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मी पाहिलं की, मोठ्या पडद्यावर मला फार वेळ दाखवण्यात आलं… पण अनेक सीन मी शूट केले आहे… मी माझ्या आई – वडिलांसोबत सिनेमा पाहण्यासाठी गेलेलो… अशात मला प्रचंड वाईट वाटलं. आपण मोठ्या पडद्यावर अधिक काळा दिसलं पाहिजं… अशीच प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते… माझे अनेक सीन कट करण्यात आले. जो माझ्यासाठी फार मोठा धक्का होता… पण माझ्या आई – वडिलांनी कायम आभारी राहण्यास सांगितलं…’ असं देखील अभिनेता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत म्हणाला.

Follow Us