AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Vs Bharat | ‘भारताचा भारत म्हणून उल्लेख होत असेल तर…’, जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया

India Vs Bharat वादावर सेलिब्रिटी देखील होत आहेत व्यक्त; भारत की इंडिया... जॅकी श्रॉफ यांची मोठी प्रतिक्रिया... सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा..

India Vs Bharat | 'भारताचा भारत म्हणून उल्लेख होत असेल तर...', जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया
| Updated on: Sep 06, 2023 | 12:18 PM
Share

मुंबई : 6 सप्टेंबर 2023 | देशात सध्या एका विषयामुळे वातावरण तापलं आहे आणि तो विषय आहे देशाचं नाव.. देशाचं एकच नाव असू शकतं – भारत… या प्रकरणामुळे सध्या देशात वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर फक्त राजकीय व्यक्तीचं नाही तर, सेलिब्रिटी देखील स्वतःचं मत मांडत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. आता अभिनेते जॅकी श्रॉफ यांची देखील याप्रकरणावर प्रतिक्रिया समोर येत आहे. सध्या सर्वत्र देशाचं नाव आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रतिक्रियेची चर्चा रंगत आहेत.

९ – १० सप्टेंबर रोजी दिल्लीत जी-20 शिखर परिषद होणार आहे. या समिटमध्ये अनेक सेलिब्रिटींना डिनरसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. जॅकी श्रॉफ यांना देखील आमंत्रण आहे . यावर जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘ भारताचा भारत म्हणून उल्लेख होत असेल तर ती वाईट गोष्ट नाही. इंडिया असेल तर इंडिया, भारत असेल तर भारत… माझं नाव जॅकी आहे.. पण मला काही जण जॉकी बोलतात काही जण जेकी म्हणतात..’

पुढे जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘माझ्या नावाचा उल्लेख अनेक प्रकारे करतात. पण मी स्वतःला कधीही बदललं नाही.. आपण कसे बदलू शकतो.. नाव बदलू शकतो पण आपण नाही…’ असं जॅकी श्रॉफ म्हणाले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

फक्त जॅकी श्रॉफ यांनी नाही तर, दाक्षिणात्य अभिनेता विष्णू विशाल याने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. विष्णू विशाल ट्विट करत म्हणाला, ‘शुटिंगच्या सेटवर याच विचारात होतो.. काय…? नाव बदललं…? पण का…? आपल्या देशाच्या प्रगतीला आणि अर्थव्यवस्थेला कशी मदत होवू शकते? गेल्या काही दिवसांपासून ऐकलेल्या सर्वात विचित्र बातम्यांपैकी एक आहे…’

‘इंडिया नेहमीच भारत होता. आपला देश नेहमीच इंडिया आणि भारत या नावाने ओळखला जातो. भारत अचानक का वेगळा झाला? असा प्रश्न देखील विष्णू विशाल याने उपस्थित केला आहे. सध्या सर्वत्र India Vs Bharat हा वाद सुरु आहे.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर