AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजेश खन्नांवर आरोप लावणे अभिनेत्रीला पडले महागात, बॉलिवूड इंडस्ट्रीमधून झाली गायब!

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हटले जाणारे अभिनेते राजेश खन्ना यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देणारे अभिनेते राजेश खन्ना यांनी आपल्या आयुष्यात संपत्ती आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवले.

राजेश खन्नांवर आरोप लावणे अभिनेत्रीला पडले महागात, बॉलिवूड इंडस्ट्रीमधून झाली गायब!
Rajesh Khanna
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 7:35 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हटले जाणारे अभिनेते राजेश खन्ना यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देणारे अभिनेते राजेश खन्ना यांनी आपल्या आयुष्यात संपत्ती आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवले. असे म्हटले जाते की, अभिनेता झाल्यानंतर राजेश खन्नाचे वर्तन खूप बदलले होते. त्यांनी सेटवर नखरे दाखवायला सुरुवात केली. पण 1986 साली असे काही घडले की, एका अभिनेत्रीने काकांवर गंभीर आरोप केले.

या अभिनेत्रीचे राजेश खन्नाशी नाते!

अभिनेत्री सबिहाने ‘अनोखा रिश्ता’ या चित्रपटात काम केले होते. राजेश खन्ना आधीच सुपरस्टार होते, त्यावेळी सबिहा इंडस्ट्रीत नवोदित होती आणि चित्रपट जगतात आपले वेगळे स्थान प्रस्थापित करण्यासाठी ती धडपडत होती. अहवालांनुसार, राजेश खन्ना यांनी सबिहाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, जो तिला अजिबात आवडला नाही.

राजेश खन्नावर गंभीर आरोप करण्यात आले!

हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर सबिहाने राजेश खन्नावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. एका मासिकासोबतच्या संभाषणात याचा खुलासा करताना सबिहा म्हणाली की, ‘अनोखा रिश्ता’च्या शूटिंग दरम्यान राजेश खन्ना तिच्यावर खूप भाळले होते. तिने खुलासा केला की, ‘राजेश खन्नांनी तिला अनावश्यकपणे अनेक वेळा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि तिचे लैंगिक शोषण केले’.

चित्रपटसृष्टीतून गायब झाली अभिनेत्री

मासिकाशी या संभाषणानंतर राजेश खन्नाचे काहीही बिघडले नाही, परंतु सबिहा चित्रपट जगतातून गायब झाली. यासह, राजेश खन्ना यांनी या आरोपांवर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. राजेश खन्ना यांच्यासाठी असे म्हटले जाते की, जशी त्यांनी आपल्या कारकीर्दीत प्रगती केली, त्यांचे व्यक्तिमत्त्व झपाट्याने बदलले.

जया बच्चन यांनी राजेश खन्ना यांना फटकारले!

राजेश खन्ना बद्दल अशा अनेक कथा आहेत, ज्यात राजेश खन्ना यांना इतर कलाकारांनी फटकारले होते. एक काळ होता, जेव्हा जया बच्चन यांनी राजेश खन्ना यांना खडसावले, जेव्हा काकांनी अमिताभ बच्चन यांच्या विरोधात टिप्पणी केली. वास्तविक, जेव्हा राजेश खन्ना सुपरस्टार बनले होते, त्या काळात अमिताभ बच्चन हे एक किरकोळ संघर्ष करणारे कलाकार होते. मग जया बच्चन यांनी राजेश खन्ना यांना सांगितले की, एक दिवस येईल जेव्हा अमिताभ बच्चन देखील सुपरस्टार होतील.

जबरदस्त स्टारडम!

अभिनेता राजेश खन्ना हे बॉलिवूडचे पहिला सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध होते. पण त्यांच्यासारखे क्वचितच इतर कोणत्याही कलाकाराला स्टारडम मिळाले आहे. त्यांनी त्यांच्या काळात अनेक सुपरहिट चित्रपट दिले. 1969 ते 1971 पर्यंत राजेश खन्ना यांनी सलग 15 हिट चित्रपटांमध्ये काम केले.

हेही वाचा :

Aryan Khan Drugs Case | आर्यन तुरुंगात, सुहाना खानची तब्येत बिघडली, शाहरुख-गौरीने कुटुंबासाठी घेतला मोठा निर्णय!

Aryan Khan Bail | आर्यन खानचा मुक्काम कोठडीतच ! न्यायालयाने निकाल राखून ठेवला, 20 ऑक्टोबरला निर्णय

अभिनेत्री स्वरदा ठिगळे साकारणार ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’!

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.