Akshay Kumar | हे विधान अक्षय कुमारला भोवणार, हे दोन चित्रपट जाणार हातामधून?, चित्रपट निर्माते नाराज
अक्षयने या चित्रपटाला नेमका कोणत्या गोष्टीमुळे नकार दिला, यावर विविध चर्चा सुरू होत्या.
मुंबई : अक्षय कुमार याने ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटाला करण्यास नकार देऊन अनेकांना मोठा धक्काच दिला. अक्षयने या चित्रपटाला नेमका कोणत्या गोष्टीमुळे नकार दिला, यावर विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, अक्षयने मागचा पुढचा विचार न करता सुरू असलेल्या चर्चांना पुर्णविराम देण्यासाठी थेट चित्रपटाची स्टोरी चांगली नसल्याचे सांगून टाकले. मात्र, हे प्रकरण अक्षय कुमारला चांगलेच भोवताना दिसत आहे. अक्षय कुमारच्या या विधानावर फिरोज नाडियाडवाला प्रचंड नाराज असल्याचे दिसत आहे.
हेरा फेरी 3 ला नकार देऊन आणि चित्रपटाची स्टोरी चांगली नसल्याचे जाहिरपणे बोलल्यामुळे अक्षय कुमारच्या हातामधून आवारा पागल दीवाना 2, वेलकम 3 हे देखील चित्रपट जाण्याची दाट शक्यता आहे. कारण फिरोज नाडियाडवाला यांना असे वाटते की, अक्षयच्या या विधानामुळे चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर मोठा परिणाम होऊ शकतो.
हेरा फेरी 3 मध्ये आता अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन याला घेतले आहे. आता चित्रपट निर्मात्यांकडून असे सांगितले जात आहे की, अक्षय कुमारने या चित्रपटासाठी 90 कोटींची फी मागितली होती, जी चित्रपट निर्मात्यांना देणे शक्यत नव्हते.
चित्रपटाची फी कमी करण्यासाठी अक्षय कुमारला बोलणे सुरू होते, फी कमी मिळत असल्याने अक्षय हा चित्रपट करत नसल्याचे निर्मात्यांकडून सांगितले जात आहे. परंतू अक्षय कुमारने जाहिरपणे चित्रपटाची स्टोरी चांगली नसल्यामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला, हे सांगितल्यामुळे चित्रपटावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
चित्रपटाची स्टोरी चांगली नसल्याचे कारण सार्वजनिकपणे दिल्याने अक्षय कुमारचे मोठे नुकसान होऊ शकते. आवारा पागल दीवाना 2, वेलकम 3 हे चित्रपट अक्षय कुमारच्या हातामधून जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमार याने आपल्या फीमध्ये मोठी वाढ केलीये.