AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रीकरण संपवून हॉटेलमध्ये आले ते परत बाहेर आलेच नाहीत; प्रसिद्ध निर्मात्याचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू

फिल्म इंडस्ट्रीवर गेल्या काही दिवसांपासून एकामागोमाग एक दु:खाचा डोंगर कोसळत आहे. कालच अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा अपघातात मृत्यू झाला. तर नितेश पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू जाला. त्यानंतर आज आणखी एका भोजपुरी अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे.

चित्रीकरण संपवून हॉटेलमध्ये आले ते परत बाहेर आलेच नाहीत; प्रसिद्ध निर्मात्याचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू
Subhash Chandra Tiwari Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 25, 2023 | 6:35 AM
Share

लखनऊ : महाराष्ट्रातील इगतपुरी येथे एका हॉटेलमध्ये दिग्दर्शक नितेश पांडे यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे एकच खळबळ माजलेली असतानाच आणखी एका निर्माता आणि दिग्दर्शकाचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातली रॉबर्ट्सगंज येथील एका हॉटेलात भोजपुरी निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष चंद्र तिवारी यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. चित्रीकरण संपवून तिवारी हॉटेलात रात्री उशिरा आले होते. पण बराच वेळ झाला तरी त्यांनी हॉटेलचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांचा रुम उघडण्यात आला असता त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

सुभाष चंद्र तिवारी हे चित्रीकरणाच्यासाठी हॉटेलमध्ये थांबले होते. चित्रीकरण संपवून ते हॉटेलमध्ये आले होते. पण बराच वेळ झाला तरी त्यांनी हॉटेलचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी 112 क्रमांकावर फोन फिरवून पोलिसांना बोलावून घेतलं. रॉबर्ट्सगंज पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मनोज कुमार सिंह हे आपल्या लवाजम्यासह हॉटेलात दाखल झाले. त्यानंतर हॉटेलचा दरवाजा तोडून पोलीस आत गेले असता त्यांना तिवारी यांचा मृतदेह बेडवर पडलेला दिसला. पोलिसांच्या सांगण्यानुसार, तिवारी यांचा मृतदेह थंड पडला होता. त्यांचा मृत्यू झाला असं दिसून येत होतं.

चित्रीकरण संपले होते

पोलिसांनी तात्काळ तिवारी यांना जिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तिवारी हे वाराणासीचे रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत राहूनच ते आपलं सर्व काम करायचे. सोनभद्र येथे त्यांच्या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं. हा सिनेमा जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे सिनेमाचे क्रू मेंबर, अभिनेत्री आणि अभिनेते आपआपल्या घरी निघून गेले होते. पोलिसांच्या सांगण्यानुसार, पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतरच तिवारी यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, तिवारी यांच्या निधनामुळे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

इंडस्ट्रीला झटका

गेल्या काही दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कालच साराभाई वर्सेस साराभाई फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा कार अपघातात मृत्यू झाला. कुलू मनालीला जात असताना तिची कार दरीत कोसळली. तर इगतपुरी येथील एका हॉटेलमध्ये अनुपमा फेम अभिनेते नितेश पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे छोट्या पडद्यावर शोककळा पसरली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.