AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन वर्षापूर्वीच भविष्यवाणी केली होती… पंजाबच्या हिंसाचारानंतर कंगना पुन्हा बोलली; ‘ती’ पोस्ट होतेय व्हायरल

दोन वर्षापूर्वी शेतकरी बिलाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कंगनाने दहशतवादी आणि खलिस्तांनी म्हटलं होतं. कंगनाच्या या पोस्टवर प्रचंड वाद झाला होता. तिच्या या विधानाविरोधात अनेक शहरात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन वर्षापूर्वीच भविष्यवाणी केली होती... पंजाबच्या हिंसाचारानंतर कंगना पुन्हा बोलली; 'ती' पोस्ट होतेय व्हायरल
Kangana RanautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 25, 2023 | 11:20 AM
Share

मुंबई : पंजाबच्या अमृतसरमध्ये हिंसाचार भडकला आहे. अजनाला येथे तर पोलीस ठाण्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये या हिंसाचारामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूड क्वीन कंगना रनौतने एक मोठं विधान केलं आहे. दोन वर्षापूर्वीच मी याबाबतचं भाकीत केलं होतं. पण तेव्हा माझ्या कारवर हल्ला करण्यात आला होता, असं कंगनाने म्हटलं आहे. कंगनाने फेसबुकवर पोस्ट करून आपलं म्हणणं मांडलं आहे. तसेच तिच्या जुन्या ट्विटचा दाखलाही तिने दिला आहे.

वारिस पंजाब दे या संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला करून पोलीस ठाणे ताब्यात घेतलं आहे. पंजाबमधील परिस्थिती अत्यंत तणावाची बनली आहे. त्यामुळे देशभरातील नागरिक हादरून गेले आहेत. त्यातच कंगनाने फेसबुक पोस्ट करून आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली आहे. आपल्या भाकिताचीही आठवण करून दिली आहे. तसेच खलिस्तानी शिखांना सल्लाही दिला आहे.

पोस्टमध्ये काय म्हटलं?

पंजाबमध्ये आज जे काही होत आहे. त्याची भविष्यवाणी मी दोन वर्षांपूर्वीच केली होती. पण माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. माझ्या कारवर पंजाबमध्ये हल्ला करण्यात आला. असं असलं तरी मी जे भाकीत वर्तवलं होतं तेच झालं. आता गैर खलिस्तांनी शिखांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली आहे, असं कंगनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दोन वर्षापूर्वीचं भाकीत काय?

दोन वर्षापूर्वी शेतकरी बिलाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कंगनाने दहशतवादी आणि खलिस्तांनी म्हटलं होतं. कंगनाच्या या पोस्टवर प्रचंड वाद झाला होता. तिच्या या विधानाविरोधात अनेक शहरात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वादानंतर कंगना पंजाबला पोहोचली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी तिच्या कारला घेराव घातला होता.

त्यानंतर तिने इन्स्टाग्राम पोस्टमधून या घटनेवर भाष्य केलं होतं. मी पंजाबमध्ये प्रवेश करताच माझ्या कारला घेरलं गेलं. कारवर हल्ला करण्यात आला. आता अमृतसरच्या अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला करण्यात आळा आहे. त्यामुळे कंगना दोन वर्षापूर्वीचं आपलं भाकीत सांगितलं आहे.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...