AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 2: अखेर 2 ऑक्टोबरचं सत्य बाहेर येणार; विजय कबूल करणार गुन्हा?

'दृश्यम 2'मध्ये सस्पेन्स-थ्रिलरचा डबल डोस; टीझर पाहिलात का?

Drishyam 2: अखेर 2 ऑक्टोबरचं सत्य बाहेर येणार; विजय कबूल करणार गुन्हा?
Drishyam 2 Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 29, 2022 | 2:31 PM
Share

“2 अक्तूबर को क्या हुआ था?”, हा प्रश्न सिनेप्रेमींना चांगलाच माहीत असेल. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटातील हा डायलॉग तुफान गाजला. यावर आजही मीम्स व्हायरल होतात. अजय देवगणची (Ajay Devgn) मुख्य भूमिका असलेला हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. पहिल्या भागाचं यश पाहता निर्मात्यांनी या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दृश्यम 2’चा (Drishyam 2) टीझर नुकताच प्रदर्शित प्रदर्शित झाला आहे.

या टीझरच्या सुरुवातीला पहिल्या भागातील काही रिकॅप्स पहायला मिळतात. त्यानंतर कॅमेरासमोर विजय साळगावकर (अजय देवगण) त्याच्या गुन्ह्याची कबुली देताना दिसतो. दृश्यममध्ये अजयसोबत श्रिया सरन, इशिता दत्ता, तब्बू यांच्याही भूमिका होत्या. विजय आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे आयजी मीरा देशमुखच्या (तब्बू) मुलाची हत्या लपवण्याचा प्रयत्न करत असतात.

पहा टीझर-

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

“जब कोई गवाह और सबूत नही होता, तो कन्फेशन ही सबसे बडा सबूत बन जाता है,” असा तब्बूचा संवाद या टीझरच्या अखेरीस ऐकायला मिळतो. त्यानंतर अजय कॅमेरासमोर कबुली देताना पहायला मिळतो.

या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. पहिल्या भागाचा रिकॅप पाहून अंगावर काटा आला, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. तर सीक्वेची उत्सुकता आहे, असंही एकाने म्हटलंय.

अभिषेक पाठकने या सीक्वेलचं दिग्दर्शन केलं आहे. पहिल्या भागातील मुख्य कलाकार या सीक्वेलमध्ये दिसणार आहेत. त्याचसोबत अभिनेता अक्षय खन्ना यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. येत्या 18 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.